ठाणे : एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ठाणे : वृद्धाची ६८ लाख रुपयांना फसवणूक

monkey disrupts sri lanka power wupply
Blackout in Sri Lanka: एका माकडामुळे आख्ख्या देशातला वीजपुरवठा खंडित; रविवारी श्रीलंकेत तीन तास ‘ब्लॅकआऊट’, सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव!
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ambernaths sunday night went dark due to fault power restored by midnight
निम्मी रात्र अंधारात, सकाळी पाणीही कमी दाबाने अंबरनाथकरांचे हाल, पडघा येथून येणाऱ्या वाहिनीवर झालेला बिघाड
PMRDA flats to be auctioned by Chief Minister on Wednesday Pune news
पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत
Mahabhishek of Sunrays to Dagdusheth Halwai Ganapati Pune print news
नेमके काय घडले शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक 
Ajit Pawar announcement for village after Guillain Barre Syndrome outbreak
पुण्यातील ‘जीबीएस’च्या उद्रेकानंतर अजित पवारांची समाविष्ट गावांसाठी मोठी घोषणा
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
thane Due to maintenance work in Jambhul water treatment plant water supply shut for 24 hours
शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसेच, पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader