बुलेट ट्रेन प्रकल्पावरून मोठा वाद झाल्यामुळे हा प्रकल्प केंद्रातील मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी वेळोवेळी आक्षेप देखील घेतले आहेत. मात्र, अखेर या प्रकल्पाचं काम सुरू झालं असून त्यासाठी जमीन अधिग्रहणाचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. याचदरम्यान, ठाण्यातील बुलेट ट्रेनच्या मार्गासाठीचा जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून रखडला होता. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगर पालिकेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून हा प्रस्ताव ताटकळला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील मार्गाचं काम पुढे सरकत नव्हतं. मात्र, बुधवारी झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अचानक हा विषय चर्चेला आला आणि कोणत्याही चर्चेविनाच त्यावर मंजुरीची मोहोर उमटली! त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा