लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात ३० ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर, ८ ठिकाणी पाणी साचले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन नागरिकांचे हाल झाले.

nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

ठाणे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवार रात्र आणि गुरूवार सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मौसमातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी म्हणजेच ४ जुलै २०२२ रोजी शहरात १४६ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी हा सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-ठाणे: घोडबंदर मार्गावरून शक्य असल्यास वाहतूक टाळा

मोठ्याप्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरातील ८ सखल भागांमध्ये पाणी साचले होते. वंदना सिनेमागृह, वृंदावन तसेच इतर भागांमध्ये पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन नोकरदार वर्गाचे हाल झाले. तसेच परिसरातील नागरिकांचे हाल झाले. पहाटेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ३० ठिकाणी झाडे उन्मळून पडले तर ३ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Story img Loader