ठाणे : ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या प्रकल्पासाठी घोडबंदर येथील कासारवडवली भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ सिमेंट काँक्रीट तयार करण्यासाठीचा (आरएमसी) प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ध्वनी प्रदूषण आणि धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले असून रविवारी येथील नागरिकांनी ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> ठाणे : येऊरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा; गोंगाटाविरोधात आदिवासी, पर्यावरणवाद्यांचे आंदोलन

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Ghodbunder Ghat Road, Ghodbunder Ghat Road Repairs, Ghodbunder Ghat Road Repairs to Conclude 7th June Evening, heavy traffic on ghodbunder road, thane news, ghodbunder road news,
घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार

ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या कामाकरिता कासारवडवली येथे हावरे सिटी गृहसंकुलाला लागूनच ‘आरएमसी’ प्रकल्प सुरू आहे. तसेच संजय गांधी उद्यानाजवळ हा प्रकल्प आहे. या आरएमसी प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम हावरे सिटी गृहसंकुलातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

या गृहसंकुलात ३० हून अधिक इमारती आहेत. तसेच येथे आठ हजारहून अधिक रहिवाशी राहतात. परिसरात एक शाळा देखील आहे. आरएमसी प्रकल्पात दिवस रात्र कामे सुरू असतात. त्यामुळे रात्री ध्वनी प्रदुषण होत असून रहिवाशांची झोपमोड होऊ लागली आहे. ज्येष्ठ नागरिकांना दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. आरएमसी प्रकल्पात दररोज शेकडो डम्पर राडारोडा घेऊन जात असतात. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याशिवाय, या प्रकल्पापासून काही अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून आवाजाचा त्रास वन्यजीवांवर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत उघड्यावरील दारूच्या दुकानांनी रहिवासी हैराण

रविवारी हावरे सिटी तसेच परिसरातील गृहसंकुलातील काही रहिवाशांनी इमारतीच्या आवारात उतरुन आरएमसी प्रकल्प बंद करा अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात लहान मुले, जेष्ठ नागरिक देखील सहभागी झाले होते. तसेच आरएमसी प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली होती.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. असे असतानाही या ठिकाणी आरएमसी प्रकल्प उभारण्यात आला. प्रशासनाने १५ दिवसांत येथील साहित्य हटवावे. अन्यथा राष्ट्रीय हरिद लवादाकडे याचिका दाखल करु.

रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.

हेही वाचा : डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

आरएमसी प्रकल्पामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी आंदोलन केले. येत्या काही दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

डाॅ. श्रद्धा रावराणे, रहिवासी, हावरे सिटी.