ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रात गाळ आणि कचरा अडकल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात ५० टक्के कपात लागू झाली असतानाच, त्यापाठोपाठ मुख्य पाणी वितरण व्यवस्थेत बुधवारी सकाळी बिघाड झाल्याने शहराचा पाणी पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत हे काम सुरू असल्याने शहरातील पाणी वितरणाचे गणित कोलमडून शहरातील पाणी टंचाईच्या संकटात भर पडली.

ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदी पात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात गाळ आणि कचरा येऊन अडकल्याने शहरात ५० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू असून या कामामुळे ११ जुलैपर्यंत शहरात अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी वितरणाचे गणित कोलमडल्याने ठाणेकरांचे हाल होत आहेत.

IIT mumbai
तेल शुद्धीकरण कारखान्यांतून सोडलेल्या पाण्यामध्येच प्रदूषक नष्ट करणारे जीवाणू; आयआयटी मुंबईतील संशोधकांचे संशोधन
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
water discharged from bhandardara nilwande dam to pravara rive
भंडारदरा निळवंडे धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ
bar owner Nagpur, liquor Wardha,
वर्ध्यात दारू पुरवठा करणाऱ्या नागपूरच्या बार मालकावर गुन्हा; २१ लाखांचा…

हेही वाचा…सासुच्या छळाने त्रस्त पोलीस पत्नीची कल्याणमध्ये आत्महत्या

नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून या पाणी बाटल्यांची मागणी वाढली आहे. तसेच चाळींच्या भागातही नेहमीपेक्षा कमी वेळच पाणी पुरवठा होत असून येथील नागरिकांचीही पाण्यासाठी वणवण सुरु आहे. चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागविण्यात येत असल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. असे असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीमध्ये टेमघर-माजिवडा दरम्यान बुधवारी सकाळी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे जलवाहीनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. आधीच पाणी उपसा केंद्रात अडकलेला गाळ आणि कचऱ्यामुळे ५० टक्के पाणी कपात लागू असतानाच, त्यात मुख्य पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे पाणी टंचाईत भर पडली.