ठाणे : नवी मुंबई येथील पनवेल-मुंब्रा मार्गावर दोन वर्षांपुर्वी ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या एका दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये दिले.

नवीन पनवेल खांदा काॅलनी येथे पंकज शेडगे (३७) राहत होते. ते कांजुरमार्ग येथील इन्ग्राम मायक्रो इंडिया एसएससी प्रायव्हेट लिमिटेड या परदेशी कंपनीत काम करत होते. ९ डिसेंबर २०२२ रोजी ते काही कामानिमित्त पनवेल – मुंब्रा मार्गावरून दुचाकीने जात होते. या प्रवासादरम्यान एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नवी मुंबई येथील कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
Malad accident case, Five people arrested,
मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी

हे ही वाचा…कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

या प्रकरणी पंकज यांच्या कुटुंबीयांनी अपघात न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी शनिवारी ठाण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने आयोजित केलेल्या लोकअदालतीत झाली. या सुनावणीत न्यायालयाने पंकज यांच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधीश एस.एन शाह यांनी दिले. शेडगे यांच्यातर्फे जी. ए विनोद यांनी तर विमा कंपनीच्यावतीने अरविंद कुमार तिवारी यांनी बाजू मांडली.