ठाणे – धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्याच्या जडणघडणीत असणारे योगदान लक्षात घेऊन खरंतर तमाम ठाणेकरांची अपेक्षा होती की या सेंट्रल पार्कला दिघे साहेबांचे नाव दिले जाईल. पण, नमो सैनिकांनी त्यांच्या नेत्यांचे नाव दिले. नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर चालण्याचे हे संकेत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी समाजमाध्यमातून केली आहे.

अलीकडेच शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी आम्ही आता नमो सैनिक असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ठाण्यातील ग्रँड सेंट्रल पार्कला मुख्यमंत्र्यांनी नमोग्रँड सेंट्रल पार्क असे नाव दिले. धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाण्याच्या जडणघडणीत असणारे योगदान लक्षात घेऊन खरंतर तमाम ठाणेकरांची अपेक्षा होती की या सेंट्रल पार्कला आनंद दिघे यांचे नाव दिले जाईल. पण नमो सैनिकांनी त्यांच्या नेत्यांचे नाव दिले. त्यामुळे नमो नमो करत शिंदे गट भाजपच्या वाटेवर चालण्याचे हे संकेत आहेत, अशी टीका केदार दिघे यांनी केली आहे.

aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
Ramdas Kadam, Ravindra Chavan,
रविंद्र चव्हाण कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी घ्यायला हवा, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची टीका
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
Eknath Shinde, Uddhav Thackeray,
संपूर्ण राज्यच माझे कुटुंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
dhav Thackeray, Thane, MNS, Uddhav Thackeray s Convoy Attacked by MNS , convoy attack, Shiv Sena, Rajan Vichare, Kedar Dighe, political clash, thane news,
मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले? ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका

हेही वाचा – ठाण्यात बहुमजली वाहनतळाची उभारणी, एमआयडीसी उभारणार ५८९ क्षमतेचे वाहनतळ

हेही वाचा – राज्यातील आशा सेविकांचा संप सुरूच राहणार, मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठाण्यातच ठाण मांडण्याचा निर्णय

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार शिंदे गटाकडे पूर्वीपासूनच नव्हते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन्ही नेते शिंदे गटाला फक्त बॅनरवरील फोटोसाठी हवे असतात. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा विचार हा कधीच भाजप धार्जिणा नव्हता. केवळ सत्ता आणि स्वतः केलेले गैरव्यवहार दडपण्यासाठीच शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली. आता त्यांच्या कृतीतून शिवसेना विरोधी भूमिका वारंवार स्पष्ट होत असून आनंद दिघे यांचा विसर शिंदे गटाला पडत चालल्याचे दिसत आहे, अशी टीकाही केदार दिघे यांनी केली आहे.