घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात उभारण्यात आलेल्या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब पुढे येताच ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या कारभारावर टिका होऊ लागली होती. या टिकेनंतर आता महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने दुरावस्था झालेल्या चौपाटीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन कामांची निविदा काढली आहे. तसेच चौपाटीवरील अंधार दूर करण्यासाठी नवीन वीज जोडणी घेण्यासाठी पाऊले उचलली असली तरी याठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाची अद्यापही नेमणुक करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुरुस्ती कामानंतर पुन्हा चौपाटीची दुरावस्था होण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत फडके रस्त्यावर अमेरिकन नागरिकाची महिलांकडून फसवणूक

Deputy Chief Minister Eknath Shinde claims regarding the Malanggad result ulhasnagar news
मलंगगडाचा निकालही दुर्गाडी प्रमाणेच लागेल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
Anmol Sagar
काम करा अन्यथा क्षमा नाही; कामात टाळाटाळ करणाऱ्या…
Charudatta Afale statement in Dombivli regarding those who made defamatory statements
मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्यांना तुरुंगात धाडा; राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांचे डोंबिवलीत प्रतिपादन
130 illegal graves structure demolished in titwala kalyan news
टिटवाळा सांगोडा येथे वनराई नष्ट करून उभारलेले १३० बेकायदा जोते भुईसपाट
Shiv Sena Uddhav Thackeray and Eknath Shinde factions disputed over Malanggad
मलंगगडावरून राजकारण तापले,शिवसेनेच्या दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
Eknath Shinde response to Sanjay Raut criticism of the literary conference in Delhi
हा तर महादजी शिंदे यांचा अपमान; एकनाथ शिंदेंचा पलटवार, संजय राऊतांनी केलेला राजकीय दलालीचा आरोप
Gambling places in Dombivli news in marathi
डोंबिवलीत नेहरू रस्त्यावर पंजाबी भाईचा जुगार अड्डा
Work start on Chole Power House to Govindwadi bend road in Dombivli news
डोंबिवलीतील चोळे पाॅवर हाऊस ते गोविंदवाडी वळण रस्त्याच्या कामाला प्रारंभ
Temperatures likely to rise in Thane and Palghar districts
पहाटे गारवा, दुपारी उष्णता; वातावरणातील बदलाची चिन्हे, तापमान वाढण्याची शक्यता

ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारण्यात आली आहे. या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे ४० कोटींचा निधी खर्च केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेल्या या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी काही महिन्यांपुर्वी उघडकीस आणली होती. याठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडण्याची भिती व्यक्त करत ही चौपाटी महिला आणि मुलींसाठी सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला होता. या चौपाटीवरील विद्युत खांब विजेअभावी बंद आहेत. त्यामुळे चौपटीवर सर्वत्र अंधार असतो. सुरक्षितेच्या दृष्टीने येथे एकही सुरक्षा रक्षक नसतो. या चौपाटीवर स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. परंतु वीज आणि पाण्याची व्यवस्था तिथे नाही. शिवाय प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले असून येथील नळ गायब झालेले होते. याठिकाणी रात्री मद्यपी लोकांचा सर्रास वावर असून जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे समोर आले होते. अवघ्या तीन वर्षातच चौपाटीची दुरावस्था झाल्याने ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या कारभारावर टिका होऊ लागली होती. या टिकेनंतर आता महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने दुरावस्था झालेल्या चौपाटीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन या कामांसाठी १ लाख ३५ हजारांची निविदा काढली आहे. यानुसार नळ बसविणे, प्लंबिंग कामाबरोबरच किरकोळ दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

हेही वाचा- प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या

चौपाटीवरील स्वच्छतागृहातील गायब झालेले नळ पुन्हा बसविण्यात येणार असून त्याचबरोबर नळ जोडणीसह इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी महाराष्ट्र मरिटाईम बोर्डाने निविदा काढली आहे. चौपाटीवरील अंधार दूर करण्यासाठी नवीन वीज जोडणी घेण्याचे कामही सुरु केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु याठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणुक करण्याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे दुरुस्ती कामानंतर पुन्हा चौपाटीची दुरावस्था होण्याची भिती आहे, असे मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.

Story img Loader