ठाणे : बेसुमार पाणी वापराला लगाम बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जलमापके बसविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणेच देयक आकारले जाणार आहे. उर्वरित २० टक्के जलमापके बसविण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील चाळी आणि झोपडपट्टी भागात ठोक पद्धतीने पाणी देयके आकारली जात आहेत. यामुळे चाळी आणि झोपडपट्टी भागात पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. घरासमोरील रस्ते आणि वाहने पाण्याने धुणे असे प्रकार सुरू असतात. तर, शहरातील इमारतींमध्ये घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी देयकांची आकारणी केली जाते. जलमापके बसविण्यात आलेली नसल्यामुळे पाणी वापर नेमका किती होतो, याचा अंदाज पालिका प्रशासनाला येत नव्हता. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर जलमापके बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. करोना टाळेबंदीच्या काळात हे काम काहीसे थंडावल्याचे चित्र होते. परंतु करोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली.

municipal commissioner bhushan gagrani inspected Sewage treatment center progress near sea setun bandra west
वांद्रयातील मलजल प्रक्रिया केंद्र जुलै २०२७ पर्यंत केंद्र कार्यान्वित करणार, मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ajit Pawar announcement for village after Guillain Barre Syndrome outbreak
पुण्यातील ‘जीबीएस’च्या उद्रेकानंतर अजित पवारांची समाविष्ट गावांसाठी मोठी घोषणा
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
article on cheaper electricity in loksatta pahili baaju
विजेचे अनाकलनीय गणित
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

हेही वाचा – डोंबिवलीतील गायक अविनाश देवधर यांचे निधन

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १ लाख १३ हजार ३२८ जलमापके बसविण्यात येणार आहेत. पैकी आतापर्यंत ९५ हजार ५०० जलमापके बसविण्यात आलेले आहेत. शहरातील गृहसंकुलांच्या ठिकाणी हे जलमापके बसविण्यात आली आहेत. यापैकी काही रहिवाशांना जलमापकाप्रमाणे देयके पाठविण्यात येत असून त्यामध्ये सुरुवातीला त्रुटी आढळून आल्या होत्या. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यात दुरुस्ती केली होती. जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक राहिले आहे. लोकमान्य नगर, कोपरी, आनंद नगर, बाळकुम, वाघबीळ, ओवळा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये काही ठिकाणी जलमापके बसविण्याची कामे शिल्लक आहेत. ‌उर्वरीत १७ हजार ८२८ जलमापके बसविण्याचे काम शिल्लक असून ही कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेने ठेवले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा – डोंबिवलीत आयरे गावात पालिकेच्या आरक्षित भूखंडावर मोबाईल मनोरा

प्रभाग समितीनिहाय बसविण्यात आलेल्या जलमापकांची आकडेवारी

प्रभाग समिती आणि जलमापकांची संख्या

लोकमान्य सावरकर – ८६९१
माजीवडा मानपाडा – १८३६१
नोपाडा कोपरी – १००७६
उथळसर – ६९३२
वर्तकनगर – ७११४
कळवा – २५३०१
वागळे इस्टेट – ११३३८
दिवा – ४४८५
मुंब्रा – ३२५३
एकूण – ९५५५१

Story img Loader