कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील तीन जणांनी सहा वर्षापूर्वी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले होते. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात तीन जणांवर संशय व्यक्त करुन पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपींविरुध्द सबळ पुरावे उभे करण्यास तपास अधिकारी अयशस्वी झाल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी खुनाचा आरोप असलेल्या तीन जणांची निर्दोष मुक्तता केली.धम्मरत्न अनिल अचलखांब (३०, रा. जुनी डोंबिवली), अंकुश गणेश कुऱ्हाडे (३०, रा.अण्णानगर झोपडपट्टी, कोपर), अमोल उर्फ वैत्या भास्कर चौधरी (३५, रा. गणेशनगर, रागाई मंदिराजवळ, डोंबिवली) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अरफूल खान असे मारहाणीत मरण पावलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. रिक्षा चालकाची नातेवाईक सरोज बरकत शेख हिने याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा