ठाणे :  हवा प्रदूषण प्रकरणी १०२ जणांना पालिकेने  नोटिसा बजावल्या असून शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या १ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यासह इतर कारवाईत पालिकेने ६ हजार ८००  रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावरुन एकूण १६ टन माती संकलीत करण्याबरोबरच रस्ते पाण्याने धुण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत विदेशी चलनाच्या माध्यमातून महिलांकडून चालकाची फसवणूक

12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
Crime of theft, employee Spice Jet Airlines,
स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार
cyber crime
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक
computer engineer was cheated for Rs 1 crore by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून संगणक अभियंत्याची एक कोटींची फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे आखून देत त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथके तयार केली आहेत. या पथकाकडून हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. हवा प्रदूषण प्रकरणी १०२ जणांना पालिकेने  बुधवारी नोटिसा बजावल्या असून भरारी पथकाने १२ ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शहरात राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या १ डम्परवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. यासह इतर कारवाईत पालिकेने ६ हजार ८००  रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावरुन एकूण १६ टन माती संकलीत केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने एकूण १६ वाहनांचा वापर करुन ४.४१ कि.मीचे रस्ते पाण्याने धुतले.