लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: कांदळवनाचे प्रभावीपणे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदळवन संरक्षणासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही अज्ञातांकडून अथवा कोणाहीकडून कांदळवनाला नुकसान पोहचवीत असल्यास नागरिकांनी 1800-22-0002 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

New bridge in Malad, municipal corporation Mumbai,
मालाडमध्ये नवीन पूल, पालिका करणार १९२ कोटी रुपये खर्च
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
During Deepotsava FDA urged food sellers to follow rules and warned against adulteration
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज
BJP focuses on agriculture sector to reduce farmers anger print politics news
शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी भाजपचा कृषी क्षेत्रावर भर
Public Interest Litigation filed in Nagpur bench to remove encroachment on footpath
नागपूरचे फुटपाथ मोकळे का नाही? उच्च न्यायालयाची महापालिका, पोलिसांना विचारणा…
meeting at Provincial Office Pandharpur discussed administrative plans for Kartiki Yatra devotees
कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य, कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
Vasai Virar Municipal Corporation Fog Cannon system will be operational vasai news
शहरातील धूळ प्रदूषणावर मात्रा; वसई विरार महापालिकेची ‘फॉग कॅनन’ यंत्रणा लवकरच कार्यरत

आणखी वाचा-डोंबिवलीत सोनसाखळी चोरांना अटक

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. तसेच कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तसेच कांदळवनाच्या ऱ्हासाबाबत जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1800-22-0002 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

आणखी वाचा-पेंढरी धरणाच्या उभारणीसाठी हालचाली; भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटीस, धरण मार्गी लागण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारी असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात कांदळवनांची झाडे तोडली जात असतील, त्या ठिकाणी भराव केला जात असेल, कांदळवन रोपांची कत्तल केली जात असेल, पाणथळ जागांवर भराव ला जात असेल तसेच संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.