लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहरात कोणत्याही प्रकारच्या नियोजनाविनाच एकाच वेळेस अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. तसेच या कामांच्या मुद्द्यावरून त्यांनी पालिकेच्या कारभारावर आगपाखड केली आहे.

Jayant Patil on Ladki Bahin Yojana
सत्तेत आल्यास आघाडी सरकार ‘लाडकी बहीण योजना’ चालू ठेवणार; नेत्यांच्या टीकेनंतर जयंत पाटलांकडून निर्वाळा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Ratan Tata Death News in Marathi
Ratan Tata : “मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता; एन. चंद्रशेखर यांनी शेअर केली जिव्हाळ्याची आठवण!
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
natasha awhad post on baba siddique murder
“लॉरेन्स बिश्नोई गँगने माझ्या बाबांनाही…”; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची पोस्ट चर्चेत!
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
NCP Sharad Pawar group leader Jitendra Awad allegation regarding the project contractor thane
प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग, कंत्राट काढले जाते; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून पालिकेने रस्ते दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीने हैराण झाले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमातून पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये वाडेघरमधील तरुणाला टोळीकडून ठार मारण्याचा प्रयत्न

संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन केले आहे, असे काही दिसून येत नाही. हजारो कोटींचे रस्ते होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण, या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. १ जून ते १ ऑक्टोबर कामे करता येत नाहीत. तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करत हे हजारो कोटी जे ठाण्याच्या विकासासाठी आणले आहेत, ते पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… शहापूर उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांतर्फे आदिवासींसाठी आरोग्य शिबीर

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होत आहे, तासनतास एकाच जागी जे उभे रहावे लागते. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वासूचना न देता, त्यांच्याकडून ना हरकत दाखला न घेता त्यांना अंधारात ठेवून कामे सुरू केली आहेत. त्यामुळे पोलिसांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खरंतर ठाणे महानगरपालिकेने हे सगळे तपासायला हवे होते. महानगरपालिका डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी ते काही तपासले असेल असे मला वाटत नाही. या वाहतूक कोंडीसाठी कोणी जबाबदार व्यक्ती आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.