गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा परिणाम म्हणून शनिवारी सकाळपासूनच कल्याण अहमदनगर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कल्याणहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हारळ गावापासून थेट कांबा गावापर्यंत ही वाहतूक कोंडी होती. त्यामुळे असंख्य वाहने तासंतास रस्त्यावर खोळंबली होती.

या रस्त्याची डागडुजी वेळेत करणे आवश्यक होते –

म्हारळ गावापासून कांबापर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून जिल्हातंर्गत मोठी वाहतूक होत असते. सोबतच या महामार्गावर उल्हासनगर महापालिका क्षेत्र, म्हारळ, वरप, कांबा, रायते ते थेट मुरबाडपर्यंत अनेक गावं आहेत. या गावांची वाहतूकही याच महामार्गावरून होत असते. गेल्या काही वर्षात या महामार्गाच्या दोन्ही बाजूला टोलेजंग इमारती उभा राहिले आहेत. शेकडो इमारती येथे आजही उभारल्या जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत या रस्त्याची डागडुजी वेळेत करणे आवश्यक होते. खड्ड्यांमुळे गेल्या काही वर्षात अनेकांना येथे आपले प्राण गमवावे लागले आहे. गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खड्डे मोठे झाले असून येथून वाहनांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tilari Ghat closed for all vehicles for repair of damaged protective embankment
खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती करिता तिलारी घाट सर्व वाहनासाठी बंद
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Tax issues with companies take contract of Mumbai Goa highway work
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

विद्यार्थ्यांवर आज वाहने सोडून पायी प्रवास करण्याची वेळ –

आज या महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरासाठी एक ते दीड तास लागत होता. या महामार्गावर अनेक नामांकित खासगी शाळा आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज वाहने सोडून पायी प्रवास करण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत होता. येथील ग्रामस्थांनाही या कोंडीचा मोठा फटका बसला.

Story img Loader