लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील काटई ते बदलापूर रस्त्यावर १०० ते २०० मीटर अंतरावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक, काही ठिकाणी डांबराचे २० फुटाचे पट्टे आहेत. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे पेव्हर ब्लाॅकचे टप्पे अनेक ठिकाणी निघाले आहेत. डांबर असलेल्या भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे काटई-बदलापूर रस्त्यांवरुन प्रवास करताना प्रवाशांना खड्डे, खोळंबाचा सामना करावा लागत आहे.

police officers travelling without tickets
आता रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांची खैर नाही; ४०० पोलिसांना दंड भरण्याची रेल्वेकडून नोटीस
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
Mumbai Western Railway, new local train timetable
मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
Israel huge attack cuts off main lebanon syria road
लेबनॉनमधून सीरियात जाणारा मार्ग उद्ध्वस्त; इस्रायलचे लेबनॉनच्या दक्षिणेकडे जोरदार हवाई हल्ले
Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त

भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक नोकरदार, व्यावसायिक अंबरनाथ, कर्जत, बदलापूर परिसरात आपल्या खासगी वाहनाने, सार्वजनिक वाहनाने येजा करतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुरबाड, पुणे, कर्जत परिसरातून अनेक अवजड वाहने या रस्त्यावरुन येजा करतात. ही वाहने खड्डे, तुटलेल्या पेव्हर ब्लाॅकमुळे संथगतीने धावतात. या अवजड वाहनांच्या मागे ती वेग घेत नाहीत, तोपर्यंत अवजड वाहनांच्या मागे रांगा लागलेल्या असतात, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या इसमाला अटक

बदलापूर परिसरात गेल्यावर डी मार्ट भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे प़डले आहेत. या खड्ड्यांवर अनेक दिवसांपासून खडी, माती, काँक्रीट टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे खड्डयांचे आकार मोठे होत गेले आहेत. या खड्ड्यांमधून प्रवाशांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. बदलापूर डी मार्ट परिसरात दररोज सकाळ, संध्याकाळ खड्ड्यांमुळे अर्धा ते पाऊण तास कोंडीत अडकावे लागते, असे डोंबिवलीतील प्रवासी दीपक आरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबईत शिंदेच्या सेनेने दिला राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का

बदलापूर, कर्जत भागात काम करणारा कल्याण, डोंबिवली परिसरातील नोकरदार भाड्याचे वाहन भागीदारी पध्दतीने करुन दररोज या रस्त्यावरुन झटपट प्रवास म्हणून येजा करतात. त्यांनाही दररोज खड्ड्यांमुळे कार्यालयात उशिरा पोहचावे लागते. काटई-बदलापूर रस्त्याची अनेक ठिकाणी बांधणी सुस्थितीत आहे. परंतु, या रस्त्याच्या २०० मीटर अंतरावर सेवा वाहिन्या किंवा अत्यावश्यक सुविधेसाठी ठेकेदाराने १५ फूट अंतरावर पेव्हर ब्लाॅक काही ठिकाणी डांबराचे पट्टे तयार केले आहेत. या पट्ट्यांची निगा राखली जात नाही. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक निघाले आहेत. डांबर भागात खड्डे पडले आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. बदलापूर डी मार्ट भागातील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.