ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत असतानाच, सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या भिवंडी शहरात गोवर संशयित आजाराच्या दोन मुलांचा मृत्यु झाल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी एकाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालतून पुढे आली आहे तर, दुसऱ्या मुलाचा मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिवंडी शहरात दररोज १० ते १२ गोवर संशयित आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने शहराची आरोग्यचिंता वाढली आहे. त्यातुलनेत जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये मात्र गोवर आजाराची रुग्ण संख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>ठाणे: कार घेऊन दरोडा करण्यासाठी आलेल्यांचा प्रयत्न फसला

kolhapur river
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
five people survived after drown in waterfall in lonawala but three died
लोणावळा: ‘त्या’ धबधब्याच्या प्रवाहातून १० पैकी पाच जण सुखरूप वाचले, वाहून गेलेल्या ५ जणांपैकी तिघांचा मृत्यू
Water Crisis Looms in Uran, Punade Dam, Punade Dam Dries Up, Tanker Supply Likely in uran tehsil, uran tehsil, marathi news, uran news,
उरण : पुनाडे धरण आटल्याने दहा गावांत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टँकरमुक्त तालुका टँकरग्रस्त
Washim, contaminated water,
वाशिम : दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली; अनेकांना उलटी, मळमळचा त्रास
Increase in Epidemic Diseases in Thane District
ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर; १५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण
Pune, Ten Year Old Boy, Ten Year Old Boy Dies of Electric Shock, Electric Shock, Pune's Vadgaon Sheri,
विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना
water storage below 6 percent in all seven dams
धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम; मुंबईच्या धरणांतील साठा ६ टक्क्यांच्या खाली

भिवंडी शहरात यंदाच्या वर्षभरात गोवर आजाराचे ३४१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये २११ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीकरीता मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ४४ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. रुग्ण बाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरू केले असून त्यात गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नसल्याचे समोर आले आहे. गोवर संशियत रुग्णांपैकी दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यापैकी एका १४ महिन्यांच्या मुलीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर ६ महिन्याच्या मुलीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे उपचारादरम्यान दोघींचा मृत्यु झाला आहे. या वृत्तास भिवंडी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. एका मुलीची गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालतून पुढे आली आहे तर, दुसऱ्या मुलीचा मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच घरोघरी सुरु असलेल्या सर्व्हेक्षण दररोज १० ते १२ गोवर संशियत आजाराचे रुग्ण आढळून येत असून शहरात लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चार महिन्यात १९५ कोटी मालमत्ता कर वसुलीचे आव्हान ;‘कडोंमपा’ची मागील आठ महिन्यात १८० कोटी वसुली

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये वर्षभरात गोवर आजाराचे १८५ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १८५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात गोवरचे २८ तर रुबेला गोवरचे ५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आक्टोबर महिन्यात १४ गोवरचे आणि पाच रुबेला गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. तर नोव्हेंबर महिन्यात २ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. बहुतांश रुग्ण हे मुंब्रा-कौसा भागातील असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. राणी शिंदे यांनी दिली. गेल्या आठवड्यात बदलापूर शहरात गोवर संशयीत दोन मुले आढळली होती. मात्र ते बाधित नव्हते, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कै. दुबे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे. तर अंबरनाथ शहरात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या एका संशयित रूग्णाचे नमुने परिक्षणासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हरेष पाटोळे यांनी दिली आहे. उल्हासनगर शहरात अद्याप एकही गोवरचा रूग्ण किंवा संशयित आढळला नसल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली आहे. कल्याण-डोंबिवली शहरातही एकही बाधीत रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन संशयित आणि तीन बाधीत रुग्ण आढळले असून तेही भिवंडी ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.