लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: तब्बल २४ तासानंतर बदलापूर मधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बदलापूर वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी १५.९० मीटर इतकी होती. १६.५० मीटर इशारा पातळीच्या खाली सध्या उल्हास नदी वाहते आहे. त्यामुळे बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
khadakwasla water, khadakwasla ,
‘खडकवासल्या’तील पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष

गेल्या दोन दिवसात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत संततधर होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची नदी असलेल्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली. बुधवारी सकाळी उल्हास नदीने १६.५० मीटरची इशारा पातळी ओलांडली होती. त्यानंतर दुपारी ३ नंतर उल्हास नदी १७.५० मीटरच्या आपल्या धोका पातळीवरून वाहत होती. त्यामुळे बदलापूर आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सखल भागात पाणी शिरू लागले होते. सायंकाळी सहा नंतर उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली.

आणखी वाचा-कल्याण-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला, रायते नदी पुलावरील पाणी ओसरले

सकाळी ११ वाजेपर्यंत उल्हास नदी इशारा पातळीच्या जवळ अर्थात १६.२० मीटर पातळीवरून वाहत होती. मात्र त्यानंतर रायगड जिल्ह्यात कमी झालेला पाऊस आणि बदलापुरातही पावसाने घेतलेल्या थोड्या विश्रांतीमुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची बदलापूर येथील पाणी पातळी १५.९० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापुरातील पुराचा धोका काही अंशी टळला. पाणी पातळी कमी झाल्याने बदलापूर येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

Story img Loader