उल्हासनगर: गेल्या काही दिवसांपासून पाणी बिलाच्या थकबाकीचे ओझे घेऊन फिरणाऱ्या उल्हासनगर महापालिकेला दिलासा मिळण्याची आशा आहे. उल्हासनगर पालिकेला १२० दशलक्ष लिटर पर्यंतचे पाणी ८ रूपये तर त्यापुढील पाणी १२ रूपये प्रति हजार लिटर दराने मिळते आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकाच दराने पाणी देण्याबाबत धोरण ठरवण्याचे आदेश एमआयडीसीला दिले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेला पाणी दरात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पालिकेच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शहरातील पाण्याच्या विविध समस्या उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडल्या. उल्हासनगर शहराला शहाड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. ती योजना उल्हासनगर महापालिका हस्तांतरीत करावी अशी मागणी पालिकेची होती. या मागणीला राज्याचे उद्योगमंत्री आणि एमआयडीसीचे प्रमुख उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबतचा अभ्यास करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.   उल्हासनगर शहराला उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडर देण्याची मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यावर बोलताना, एक्सप्रेस फिडर तातडीने मंजूर करून द्यावेत, असे आदेश उद्योग मंत्र्यांनी दिले. उल्हासनगर शहराची पाण्याची वाढती मागणी पाहता शहराला एमआयडीसीकडून अतिरिक्त ५० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी करण्यात आली. त्यावरही उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करताना एमआयडीसी १२० दशलक्ष लीटर पर्यंतच्या पाण्यासाठी ८ रूपये तर त्यावरील पाण्यासाठी १२ रूपये प्रति हजार लीटर दर आकारते. एमआयडीसी पालिकेकडे प्रति महिना ३ कोटी ७५ लाखांचे बिल आकारते. मात्र पालिका फक्त अडीच कोटींचे बिल अदा करते. त्यामुळे पालिकेची पाणी बिलाची थकबाकी ६६७ कोटी १६ लाखांवर पोहोचली आहे.

thane water loksatta news
ठाण्याला मिळणार दोन वर्षात दोनशे दशलक्षलीटर वाढीव पाणी, ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
पुण्याच्या पाण्याचे पालकत्व कुणाकडे?
Vadgaon Sheri water issue pune
वडगाव शेरीत पाणीप्रश्न पेटणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार पठारे करणार तक्रार !
pimpri ro water purifier projects
पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्पावर नियंत्रण कोणाचे? अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेने जबाबदारी नाकारली
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम

ही बिलातील तफावत कमी करून शहराला एकच दराने पाणी द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी मंत्री महोदयांनी दिले. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी होणार आहे. तर अतिरिक्त ५० दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही आश्वासन यावेळी दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Story img Loader