कल्याण : पावसाळ्यात ठराविक कालावधीत येणाऱ्या रानभाज्यांच्या पाककृतीचा उत्सव कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्यांची प्रत्येकाला ओळख व्हावी. या भाज्यांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील रहिवाशांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या विचारातून हा उपक्रम आयोजित केला होता.

गोवेली गावातील जीवनदीप महाविद्यालयातील ६० विद्यार्थी, विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले होते. आताच्या झटपट चटपटीत हातगाड्यांवरील पाश्चात्य पदार्थांच्या खाद्य पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या नवीन पीढीला जंगलात पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांची ओळख व्हावी. या भाजांमधून शरीराला मिळणारी पौष्टिक खनिजे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या विचारातून हा उपक्रम आयोजित केला होता, असे जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.

pune bopdev ghat gangrape
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Abuse on Girl pune, Pune college Girl Abuse,
पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा
Pune and Pimpri Chinchwad Schools and colleges holiday due to rain Pune news
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना उद्या मुसळधार पावसाचा इशाऱ्यामुळे सुट्टी
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
Chanakya Skill Development Center in which college in Nagpur district
नागपूर जिल्ह्यात या महाविद्यालयात चाणक्य कौशल्य विकास केंद्र
sandalwood trees stolen from sppu premises again pune print news
विद्यापीठाच्या आवारात पुन्हा चंदन चोरी- शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ
Students are scared due to rush of vehicles in front of Charisma Primary and Secondary school in Nagpur
भरधाव वाहनांमुळे विद्यार्थी भयभीत! नागपुरातील ‘या’ शाळेसमोरील स्थिती; अपघाताची टांगती तलवार…

हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस, पश्चिम उपनगरात जोर वाढला

जून मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून ते सप्टेंबरपर्यंत जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या भाज्या हाच यापूर्वी ग्रामीण, आदिवासी समाजातील भोजनात महत्वाचा घटक होता. विद्यार्थिंनींनी शेवळाचा रस्सा, टाकळ्याची भाजी, आंबट बिंदुकली, कोळू, लोथ, कुड्याची फुले, अळू, वळीचे कांद, भोकर, भोवरा, कोराळ, सुक्या मोदुड्या, अंबाडी, चायवाल या रानभाज्यांच्या पाककृती तयार केल्या होत्या.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रोजच्या ४०० रुपयांच्या मजुरीमुळे भातशेतीकडे पाठ

या पाककृती स्पर्धेत सानिका देवकर हीने प्रथम, मानसी मगर हिने व्दितीय, काजल धुमाळ हिने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये अंकिता कोर, संजना बोतकुंडले, संचिता मलिक यांनी तर, मुलांमध्ये मानस तारमळे, चेतन वाडगे, क्रिश भोईर यांनी अनुक्रमे प्रथम ते तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवलीतील प्रसिध्द खवय्या राहुल चौधरी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य डाॅ. के. बी. कोरे, प्राचार्य प्रकाश रोहणे, प्रा. स्नेहा भोंडविले, प्रा. नरेश टेंभे, प्रा. पी. एच. पाटील उपस्थित होते.