किशोर कोकणे

ठाणे : कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना पायी ठाणे रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा असा पादचारी पुल तयार करण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून विटावा येथून अवघ्या पाच ते सात मिनीटांत ठाणे स्थानक गाठता येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास खर्च, वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. दररोज शेकडो नागरिक या पादचारी पुलाचा वापर करत आहेत. पूर्वी पादचारी पूल नसल्याने अनेकांना विटावा-ठाणे दरम्यान रेल्वे रूळांवरून चालत जाताना जीव गमवावा लागला होता.

Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

कळवा, विटावा आणि दिघा भागात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. ठाणे आणि कळवा विटावा या दोन भागांमधून ठाणे खाडी जाते. येथील नागरिकांना ठाणे स्थानकात येण्यासाठी वळसा घालून २० ते २५ मिनीटांचा प्रवास करावा लागत होता. अनेकदा वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचा अधिक वेळ वाया जातो. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी काही नागरिक रेल्वे रूळांवरून चालत विटावा येथून ठाणे स्थानक गाठत होते. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या धडकेत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले. ठाण्याला जोडण्यासाठी विटावा ते ठाणे हा पादचारी पुल उभारण्यात यावा अशी मागणी केली जात होती. नागरिकांचे अपघातात प्राण जात असल्याने या पुलाच्या कामाला २०१४ मध्ये मान्यता मिळाली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) २० एप्रिल २०१७ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. दोन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु करोना तसेच अनेक तांत्रिक कामांमुळे या पुलाच्या कामास अडचणी येत होत्या. मे २०२३ मध्ये पादचारी पूलाची कामे पूर्ण झाली. यासाठी एकूण २४ कोटी ५५ लाख रुपये इतका खर्च होता.

आणखी वाचा-ठाण्यात दसऱ्यानिमित्त सवलतींचा वर्षाव

पूल बांधून पुर्ण झाला असल्याने लोकार्पणाची वाट पाहणे टाळत नागरिकांनी पुलाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. दिघा, विटावा आणि कळवा येथील पश्चिमेकडील भागातील नागरिक या पूलाचा वापर करू लागले आहेत. विटावा ते ठाणे गाठण्यासाठी शेअरिंग रिक्षाचे प्रतिप्रवासी २० रुपये मोजावे लागत होते. तसेच विटावा ते चेंदणीकोळीवाडा प्रवासासाठी २० ते २५ मिनीटे वाया जात होती. पुल झाल्याने अनेकांचा हा प्रवास खर्च वाचला आहे. तसेच वेळेची बचत होऊन पाच ते सात मिनीटांत चेंदणी कोळीवाडा गाठता येणे शक्य होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे वाहतुक कोंडीतून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. हा प्रकल्प झाल्याने आता ठाणे गाठण्यासाठी केवळ पाच मिनीटे लागत आहे. -नूतन जांभेकर, विटावा.

Story img Loader