कल्याण: बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पूर्व आडिवली-ढोकळी भागात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा इमारतींमधील शौचालय टाक्यांमधील मलपाणी रस्त्यावर वाहून येत आहे.  त्यामुळे आडिवली-ढोकळी भागातील वर्दळीचा रस्ता दुर्गंधीयुक्त पाण्याने सतत भरला असल्याने वाहन चालक, प्रवासी त्रस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आडिवली-ढोकळी भागात जागा मिळेल तिथे भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना सामासिक अंतर नाही. शौचालयाच्या टाक्या रस्त्यावर, इमारतीच्या प्रवेशव्दारात बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांन्या जोडलेल्या नसल्याने मलपाणी रस्त्यावर वाहून येत आहे. रात्रीच्या वेळेत या भागातील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त होतात.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

शाळकरी मुले, पालक या रस्त्यावरुन प्रवास करतात. त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची बांधणी करावी. रस्त्यावर येणारे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याची दखल घेतली जात नाही, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात रस्त्यावरील धुळीने नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली पालिकात हद्दीत स्मार्ट सिटीची अनेक कामे सुरू आहेत. काँक्रिटीकरणाच्या कामांचे गोडवे गायले जात आहेत. कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी भागातील रहिवाशांना रस्ते सुविधेत उपेक्षेची वागणूक का दिली जात आहे, असे प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरी सुविधा प्रश्न तातडीने मार्गी लागावेत म्हणून शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे हिरीरिने प्रयत्न करत आहेत. त्यांनी या रस्ते प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आडिवली-ढोकळी भागात जागा मिळेल तिथे भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधल्या आहेत. या इमारतींना सामासिक अंतर नाही. शौचालयाच्या टाक्या रस्त्यावर, इमारतीच्या प्रवेशव्दारात बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांन्या जोडलेल्या नसल्याने मलपाणी रस्त्यावर वाहून येत आहे. रात्रीच्या वेळेत या भागातील रहिवासी दुर्गंधीने त्रस्त होतात.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

शाळकरी मुले, पालक या रस्त्यावरुन प्रवास करतात. त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची बांधणी करावी. रस्त्यावर येणारे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याची दखल घेतली जात नाही, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात रस्त्यावरील धुळीने नागरिक हैराण

कल्याण डोंबिवली पालिकात हद्दीत स्मार्ट सिटीची अनेक कामे सुरू आहेत. काँक्रिटीकरणाच्या कामांचे गोडवे गायले जात आहेत. कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी भागातील रहिवाशांना रस्ते सुविधेत उपेक्षेची वागणूक का दिली जात आहे, असे प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरी सुविधा प्रश्न तातडीने मार्गी लागावेत म्हणून शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे हिरीरिने प्रयत्न करत आहेत. त्यांनी या रस्ते प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.