लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: घोडबंदर भागातील गृहसंकुलांसाठी ५० दशलक्ष लीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर झाला असला तरी तो कागदावरच असल्याने येथील ३० गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार संजय केळकर पालिका कारभारावर प्रश्न उपस्थित करत पाणी समस्येवर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे. महापालिकेने नविन इमारतीना परवानगी देणे बंद केले पाहीजे, अशी मागणी करत येत्या दहा दिवसात पाण्याचे नियोजन केले नाहीतर स्वतः रस्त्यावर उतरून ठाणे महापालिकेवर लाँग मार्च काढेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

thane tyre killer
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात टायर किलर
Jitendra awhad marathi news
क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरु – जितेंद्र आव्हाड
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड
kalyan Dombivli municipal corporation bribe
कल्याण डोंबिवली पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक
thane municipal corporation news in marathi
ठाण्याच्या अर्थसंकल्पात आखणीत नागरिकांचा सहभाग, ठाणे महापालिकेने मागविल्या नागरिकांकडून सूचना
Kalyan Dombivli Municipal Administration will close Thakurli Chole village lake for maintenance during Ganapati visarjan
ठाकुर्ली चोळेतील तलाव गणपती विसर्जनासाठी बंद
danger of accident prone areas in thane district also come to fore while accident season is starting
ठाण्यात अपघातप्रवण क्षेत्रांचा धोका, पूर्व द्रूतगती महामार्गावरील प्रत्येक चौकात अपघात क्षेत्र
thane garbage collector sleeping on footpath killed by car
पदपथावर झोपलेल्या कचरा वेचकाच्या शरिरावरून मोटार गेल्याने मृत्यू
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले आहेत. येथील लाखो आणि कोटी रुपयांची घरे घेणाऱ्या नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर हे सातत्याने आवाज उठवीत असून त्याचबरोबर त्यांनी प्रशासनासोबत बैठका घेण्याबरोबरच मोर्चे काढले. तसेच, विधीमंडळातही आवाज उठवला. तरीही परिस्थितीत बदल झालेला नसल्याची बाब पुढे आली आहे. घोडबंदर भागातील ३० गृहसंकुलातील रहिवाशांना पाणी टंचाई समस्या जाणवत असून या संदर्भात रहिवासियांनी आमदार केळकर यांची बुधवारी भेट घेतली. आमदार केळकर यांनी रहिवाश्यासमवेत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडली.

आणखी वाचा- डोंबिवलीत रात्रीच्या वेळेत पाण्याची चोरी, शेकडो लीटर पाणी फुकट

घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांसाठी ५० दशलक्ष लीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर झाला असला तरी तो केवळ कागदोपत्री मंजुर आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीच झालेली नसल्यामुळे येथे टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. घोडबंदरच्या सुमारे ३० इमारती टँकरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजत आहेत, असा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. पाण्याची इतकी टंचाई असताना महापालिका मात्र नवनवीन बांधकामांना परवानग्या देत आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुरेसे पाणी पुरवता येत नसेल तर, नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यावर ठाणे महापालिकेने पुरेसा पाणी पुरवठा करू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीही ठाणे शहरातील अनेक भागात आजही पाणी टंचाई असूनही पालिका बहुमजली इमारतींना परवानगी देत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. शहरात ५० मजल्यांच्या १५ इमारती आणि एक ७२ मजली इमारतीला परवानगी दिली आहे. आधीच पाणी टंचाई असताना या इमारंतींमधील हजारो नागरीकांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून ही नवीन बांधकामे तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

धरणाला पुढची १० वर्षे लागतील. त्यामुळे धरण धरण करीत बसण्यापेक्षा छोटे बंधारे उभारून कल्पकतेने नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, येत्या १० दिवसाच्या आत हा परिसर टॅकरमुक्त करावा, अन्यथा, स्वतः रस्त्यावर उतरून हिरानंदानी इस्टेट ते ठामपा मुख्यालय असा लाँग मार्च काढू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Story img Loader