ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये नविन पंपिग मशिनरी बसवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात जलमापक बसवण्याचंही काम सुरू आहे. या कामासाठी बुधवारी (११ मे) सकाळी ९ वाजल्यापासून ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दरम्यानच्या २४ तासांच्या कालावधीत ठाणेकरांची पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

संबंधित कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवणं आवश्यक आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. आपल्या स्वतःच्या योजनेचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने स्टेम प्राधिकरणाचं पाणी झोनिंग पद्धतीनं ठाणे शहरात वितरीत केलं जाणार आहे.

Healthy Lifestyle Tips
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना घ्या ‘या’ ४ गोष्टींची काळजी; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
Increase in entertainment fees business license fees Mumbai print news
करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ; व्यावसायिक झोपड्यांना कर
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!

बुधवारी (११ मे) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, सिद्धेश्वर जॉन्सन, इंटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी रात्री ९ से गुरुवार सकाळी ९ वाजेदरम्यान ऋतू पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा व्यवस्था पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पुरेल इतक्या पाण्याचा साठा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.

Story img Loader