ठाणे : पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक कामांसाठी ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील मराठी उद्योजक धास्तावले?

हेही वाचा – कल्याणमध्ये बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणारा तरुण अटकेत

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाकडून जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. यावर्षीही ही कामे केली जात आहे. त्यामुळे ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाने बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत घोडबंदर, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसचे गुरुवार नंतर एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.