लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.१५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने दिली.

Ratan Tata Newspaper vendor
Ratan Tata: गरिबांचा कैवारी! रतन टाटांनी जेव्हा पेपरवाल्याला केली होती ५ लाखांची मदत, २० वर्ष घरी वर्तमान पत्र देणाऱ्याने सांगितली आठवण
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Rahul Gandhi Kolhapur
“वांग्याची, हरभऱ्याची भाजी बनवली, भाकऱ्या थापल्या”, राहुल गांधीनी कोल्हापुरात टेम्पोचालकाच्या घरात बनवला स्वयंपाक!
Cm Eknath Shinde at davos
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात १.५८ कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस
man killed grandmother because she suspicion of money theft on him
ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या
Tribute to ratan tata in mumbai local | Ratan Tata Tribute
Tribute To Ratan Tata : मुंबईकरांची रतन टाटांना अनोखी श्रद्धांजली! लोकल ट्रेनमधील ‘हे’ दृश्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या मोहिली, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत, यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता. १५) पालिकेच्या नियंत्रणाखाली ठेकेदाराकडून केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत कल्याण शहरासह, कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिमेतील ब प्रभागातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, मुरबाड रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिमेचा पाणी पुरवठा या कालवधीत बंद राहणार आहे.

आणखी वाचा-ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या

या दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.