आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही, असे म्हटले जाते. परंतु, ते शंभर टक्के सत्य नाही. कारण, वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ असे म्हटले जाते. त्याचाच अनुभाव उद्या, १७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणकरांना घेता येणार आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

“मकर वृत्त आणि कर्कवृत्त प्रदेशात दोन वेळा असे प्रसंग शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. स्थळांचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती समान झाली तर मध्यान्हकाली सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली दिसेनाशी होते. ठाण्यात बुधवारी १७ मे रोजी अक्षांशाएवढीच सूर्याची क्रांती असणार आहे. त्यामुळे मध्यान्ही १२.३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर येणार आहे . त्यामुळे सावली दिसणार नाही”, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Surya ketu yuti 2024 | Surya ketu yuti 2024 marathi news
Surya ketu yuti 2024 : १८ वर्षानंतर ग्रहांचा राजा सूर्याची केतुबरोबर होईल युती! ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळेल अपार धनलाभ
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक

बुधवार १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे मार्गदर्शन करणार आहेत.

शून्य सावली दिवस म्हणजे नेमकं काय?

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात अनुभवता येतो.

हेही वाचा >> गडचिरोली जिल्ह्यातील “ही” गावे अनुभवणार शून्य सावली दिवस; अनेकांच्या मनात कुतूहल

अजून कोठे अनुभवता येणार ?

गडचिरोलीच्या अहेरी, हेमलकसा, आलापल्ली येथे १७ मे दुपारी १२.४ वाजता शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येईल. एटापल्ली, मुलचेरा येथे १८ मे १२.५ वाजता, घोट चामोर्शी येथे १९ मे १२.६ वाजता, जिरमतारी येथे २० मे १२.५, गडचिरोली, लेखामेंढा येथे २१ मे १२.५ वाजता, आरमोरी येथे २२ मे तर देसाईगंज आणि कुरखेडा येथे २३ मे रोजी दुपारी १२.७ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येणार आहे.