पावसाळ्यात सृष्टीचे सौंदर्य बहरते. डोंगर हिरवेगार चादर पसरल्यासारखे दिसतात, डोंगर-दऱ्यांमध्ये पांढरे शुभ्र धबधबे वाहताना दिसतात. निसर्गाचे हे सौंदर्य नक्कीच पाहण्यासारखे असते पण डोंगर-दऱ्या, धबधब्यांसारख्या पर्यटन स्थळी भेट देताना सावध राहिले पाहिजे अन्यथा आपली एक चूक आपले संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकते. काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण जोरदार पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. तर ताम्हिणी घाट येथे एका तरुणाने धबधब्यामध्ये उडी मारली आणि जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पावसाळ्यात पर्यटळ स्थळी भेट दिल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर अशा घटना घडत असतात. वारंवारं सांगूनही अनेकदा लोक सावधगिरी बाळगत नाही आणि मृत्यूला आमंत्रण देतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा