Air india express recruitment Mumbai: सध्या देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या राज्यातही सरकारी नोकरीसाठी लाखो तरुण दिवसरात्र धडपड करीत आहेत. सरकारी नोकरी भेटली नाही तरी खासगी क्षेत्रात चांगला पगार देणारी एखादी प्रतिष्ठेची नोकरी मिळावी, अशी अशा घेऊन हे तरुण कष्ट उपसत आहेत. राज्यस तसेच केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक पदांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाल्यामुळे या तरुणांमध्ये हतबलता आलीय. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण आहे. बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये म्हणावी तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक प्रगती झालेली नाही आणि हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.

भरती ३०० जागांसाठी अन् जमले हजारो तरुण

TISS, Progressive Students Forum, TISS lifted ban,
मुंबई : अखेर विद्यार्थ्यांचा विजय… ‘टीस’ने प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
Bhoidapada, bogus doctor, Municipal action,
डॉक्टर नसताना कर्मचाऱ्याकडून रुग्णावर उपचार, वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथील बोगस डॉक्टरवर पालिकेची कारवाई
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
Will the quality of vistara services remain after merger with Air India
‘विस्तारा’च्या विलीनीकरणामुळे काय होणार? प्रवासी सेवेवर ‘एअर इंडिया’ची छाप पडेल का?
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या

पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र, नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. म्हणूनच एखाद्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात असेल, तर तेथे तरुणाईची झुंबड उडताना दिसतेय. असाच काहीसा प्रकार आज मुंबईतील एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत पाहायला मिळाला. एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीतर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २,७०० जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. सुरुवातीला ३०० जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. पण, त्यासाठी तब्बल २५ हजार बेरोजगार तरुण मुले भरतीच्या ठिकाणी आली होती आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. मुंबई एअरपोर्ट गेट क्रमांक ५ बाहेर हा गोंधळ झाला होता.

प्रचंड संख्येमुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी

मुंबईच्या कालिनामध्ये एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने वॉक-इन मुलाखतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी येथे नोकरी शोधणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उमेदवारांच्या प्रचंड संख्येमुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर कंपनीने लोकांना त्यांचे सीव्ही देऊन, परिसर रिकामा करण्यास सांगितले. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने अद्याप या घटनेबद्दल आणि भरती प्रक्रियेसंबंधी पुढील कोणतीही घोषणा केलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> माऊलीच्या कष्टाचं चीज केलं! डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए; आनंद महिंद्रांनी दखल घेत केली खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूच येथे वॉक-इन मुलाखतीच्या वेळीही तरुणांची इतकी गर्दी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती उदभवली होती. आता मुंबईमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.