Gandhi Jayanti History Significance in Marathi : दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Gandhi Jayanti 2023 : गांधीजी यांचे जीवन

महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते. वडील करमचंद गांधी हे पानसारी जातीचे होते. त्यावेळी ते पोरबंदरचे दिवाण म्हणजेच प्रधान होते. वयाच्या १३ व्या वर्षी गांधींचा विवाह कस्तुरबा गांधींशी झाला. त्यावेळी कस्तुरबा गांधी १४ वर्षांच्या होत्या. त्याच वेळी १८८७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढच्या वर्षी १८८८ मध्ये त्यांनी भावनगरच्या श्यामल दास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथूनच त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर म्हणून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत सराव केला; जिथे त्यांना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या अनुभवामुळे गांधीजींनी सामाजिक न्यायाच्या समर्पणाला चालना दिली. १९१६ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला.

grandchildren of Nitin Gadkari did sthapna of Pancharatna Bappa
नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
pune ganesh utsav
Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना
Teachers Day History and Significance in Marathi
Teachers Day 2024 : सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील रंजक गोष्ट
Chaturanga Pratishthan, golden anniversary,
चतुरंग प्रतिष्ठानचा २८ – २९ सप्टेंबरला सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा, विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना गौरवण्यात येणार
rahul gandhi jiu jitsu aikido
राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
India's First National Space Day on 23rd August 2024
National Space Day: भारताचा पहिला-वाहिला ‘स्पेस डे’; वर्षापूर्वी विक्रम लँडर उतरलेला चंद्रावर; जाणून घ्या खास दिनानिमित्त ‘या’ तीन गोष्टी

Gandhi Jayanti 2023: स्वातंत्रलढयामध्ये गांधीचे योगदान

भारतात परतल्यावर गांधीजींच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली. काँग्रेस नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर गांधीजी काँग्रेसचे मार्गदर्शक बनले. भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ व भारत छोडो आंदोलन केले. अहिंसा आणि सत्य या जैन आणि हिंदू धर्माच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

ब्रिटिश दडपशाहीला आव्हान देण्यासाठी अहिंसक प्रतिकार आणि सविनय कायदेभंगाचा पुरस्कार करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा आणि धोरणे तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी गुजरातमधील अहमदाबाद शहरातून दांडी यात्रेला सुरुवात केली. हा प्रवास ५ एप्रिल २९ पर्यंत चालला. १९४२ मध्ये गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. या आंदोलनात लहान मुले, वृद्ध, तरुण सर्व सहभागी झाले होते. सर्व देशवासीयांनी गांधीजींना पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलनाला यश मिळाले. भारताच्या स्वातंत्र्याचा पाया या चळवळीने घातला गेला. अहिंसेची शक्ती प्रदर्शित झाली आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चळवळींनी लक्ष वेधून घेतले. त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान किंवा अहिंसा, सत्याबरोबर (सत्याग्रह) या बाबी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या मार्गदर्शक शक्ती बनल्या. मग पाच वर्षांनंतर १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले.

गांधी जयंतीचे महत्त्व केवळ त्यांचा जन्मदिवसाचे स्मरण करण्यामध्येच नाही; तर त्यांचे नेतृत्व आणि सामाजिक न्याय व शांततेसाठी अतूट बांधिलकी ओळखण्यातही आहे.

Gandhi Jayanti 2023 : गांधी जयंतीचे महत्त्व


१. राष्ट्रपिता यांचा सन्मान- गांधी जयंती हा महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे जीवन, बलिदान व समर्पण यावर चिंतन करण्याचा हा दिवस आहे.
२. गांधीवादी आदर्शांचा प्रचार- अहिंसा, सत्य व सविनय कायदेभंग ही गांधीजींची तत्त्वे जोपासली पाहिजेत. गांधी जयंती ही आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात या आदर्शांना कायम ठेवण्याची आठवण करून देते.
३. आंतरराष्ट्रीय चळवळीला दिली प्रेरणा- गांधीच्या तत्त्वांचा प्रभाव, त्यांची कार्यपद्धती आणि शिकवणींनी जगभरातील असंख्य नागरी हक्क आणि अगदी स्वातंत्र्य चळवळीलाही प्रेरणा दिली. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन नागरी हक्क चळवळ हे याचे एक उदाहरण आहे.
४. शांततापूर्ण प्रतिकारासाठी समर्थन- शांततापूर्ण मार्गांनी बदल आणि क्रांतीदेखील साध्य केली जाऊ शकते याचे गांधी जयंती हे एक उदाहरण आहे. त्यांचा अहिंसक प्रतिकाराचा दृष्टिकोन सामाजिक बदल आणि न्यायासाठी चळवळींना प्रेरणा देत आहे.
५. शैक्षणिक प्रयत्न- विद्यार्थी आणि जनतेला गांधीजींचे जीवन, तत्त्वज्ञान आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका याबद्दल शिक्षित करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि संस्था हे शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतात.
६. समाजकारणाचा प्रचार- गांधी जयंतीमध्ये अनेकदा समाजकल्याणासाठी पुढाकार, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरे आणि विविध सामुदायिक सेवा उपक्रम आयोजित केले जातात; ज्यात गांधीजींना प्रिय मानल्या गेलेल्या मूल्यांचा प्रचार केला जातो.

हेही वाचा – गांधीजींच्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ सरकारी योजना माहीत आहेत का? नसेल तर जाणून घ्या….

गांधीजींच्या जीवनाबाबत महत्त्वपूर्ण गोष्टी

१. मोहनदास करमचंद गांधी यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
२. पूर्वीच्या बिर्ला हाऊसच्या बागेत गांधीजींची हत्या झाल्याने त्यांच्या जीवनाचा दुःखद अंत झाला.
३. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या वास्तव्याच्या काळात गांधीजींनी टॉलस्टॉय फार्मची स्थापना केली. जोहान्सबर्गपासून २१ मैलांवर ११०० एकर व्यापलेली ही एक छोटी वसाहत होती. हे शेत सत्याग्रहातील त्यांच्या सहकाऱ्यांसाठी निवासस्थान म्हणून वापरले जात होते.
४. गांधीजींनी अस्पृश्यांना प्रेमाने ‘हरिजन’ म्हणून संबोधले; ज्याचा अर्थ ‘देवाची मुले’ असा आहे.
५. मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या ‘गांधी’ ऐतिहासिक चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली आणि १९८२ मध्ये सर्वोत्कृष्ट चलच्चित्रपटाचा अकादमी पुरस्कार जिंकला.
६. ग्रेट ब्रिटन; ज्या देशाविरुद्ध गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांनी त्यांच्या निधनाच्या २१ वर्षांनंतर त्यांच्या सन्मानार्थ स्मरणार्थ तिकीट (Stamp) जारी केले; जी ब्रिटिशांच्या इतिहासातील त्यांच्या भूमिकेच्या प्रगल्भतेची पावती होती.
७. महात्मा गांधीजींचा प्रभाव किती मोठा होता हे त्यांच्या निधनानंतरही दिसून आले. त्यांची अंत्ययात्रा आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत गेली होती; जी त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेला आदर दर्शवीत होती.
८. जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दिलेल्या ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (Tryst with Destiny) या प्रतिष्ठित भाषणादरम्यान गांधीजी विशेषत: अनुपस्थित होते.

हेही वाचा – Gandhi Jayanti 2023 : मोहनदास गांधी ते राष्ट्रपिता…, कसा होता महात्मा गांधींचा जीवनप्रवास? जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी….

देशात गांधी जयंती कशी साजरी केली जाते?


गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि तत्त्वांचा सन्मान केला जातो. संस्था अनेकदा भजनांसह प्रार्थना सभा आणि त्यांच्या जीवनाबद्दल आणि शिकवणींबद्दल चर्चा करून दिवसाची सुरुवात करतात. गांधींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे चित्रण करण्यासाठी, त्यांचा शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी नाटक, पथनाट्य व प्रदर्शनांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक शैक्षणिक संस्था आणि संस्था गांधींच्या तत्त्वज्ञानावर केंद्रित चर्चासत्रे, कार्यशाळा व व्याख्याने आयोजित करतात आणि समकालीन काळात त्याची प्रासंगिकता अधोरेखित करतात. गांधीवादी मूल्यांना चालना देण्यासाठी स्वच्छता मोहीम आणि सामुदायिक सेवा उपक्रम आयोजित केले जातात. त्यात विशेषतः स्वच्छता आणि सामाजिक कल्याणावर भर दिला जातो. अनेक विद्यार्थी गांधीजींशी संबंधित निबंध लेखन, चित्रकला आणि इतर स्पर्धांमध्येही भाग घेतात; ज्यामुळे त्यांना त्यांचे जीवन आणि तत्त्वे समजून घेता येतात.