Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी अनोखा जुगाड सांगताना दिसतात तर कधी कोणी स्टंट करताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मुली स्टेजवर सुंदर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलींनी महाभारताच्या टायटल गाण्यावर डान्स केला आहे. या मुलींचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (girls beautifully dance on Mahabharat tital song their dance steps and face expression will give you goosebumps video goes viral on social media)

हेही वाचा : Gaurav Taneja Divorce: युट्यूबर गौरव तनेजा घेणार पत्नी रितू राठीबरोबर घटस्फोट? फ्लाईंग बीस्टने अखेर सोडलं मौन, म्हणाला, “जे माझ्यावर प्रेम…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मुलींचा एक ग्रुप दिसेल. हा ग्रुप स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. लाल सलवार परिधान करून केसामध्ये गजरा माळलेल्या या मुली खूप सुंदर दिसत आहे. त्या महाभारताच्या टायटल गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गाण्याचे लिरीक्स व त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. त्यांचा डान्स तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावा, असे वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

naach.esha.naach या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “है कथा संग्राम की”

हेही वाचा : “पालकांबरोबर राहताना WFH करणे म्हणजे Squid Game..” तरुणाच्या पोस्टमुळे भडकले नेटकरी, एक्सवर पेटला नवा वाद, पाहा Viral Post

तुम्ही आजवर अनेक डान्स पाहिले असेल पण असा डान्स कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्व मुलींचे खूप खूप अभिनंदन, खूप मेहनतीने या गाण्यावर जीवंत देखावा सादर केला आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “डान्स पाहून अंगावर शहारा आला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी माझ्या विद्यार्थ्यांना हा डान्स शिकवणार.” एक युजर लिहितो, “खूप छान पद्धतीने मुलींना हा डान्स शिकवला. व्हिडीओ पाहून छान वाटले.”

बी. आर चोप्रा यांची महाभारत टीव्ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेच्या माध्यमातून महाभारतातील प्रत्येक पात्र घरोघरी पोहचले होते. या मालिकाबरोबर याचे टायटल गाणंही चांगलेच लोकप्रिय झाले होते. हे गाणं ऐकले की आजही अंगावर शहारा येतो.