भारतीय क्रिकेट संघाचा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. या पराभवाने कोट्यवधी भारतीय निराश झाले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराजसह अनेक क्रिकेटपटूंना मैदानातच अश्रू अनावर झाले. अनेक जण कॅमेऱ्यासमोर आपल्या भावना लपवताना दिसले. आता खेळाडूंबरोबर चाहतेही या अनपेक्षित पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत गुरुग्राममधील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली आहे. या सुटीमुळे टीम इंडियाच्या पराभवाचा धक्का विसरण्यास मदत होईल, तसेच दुसऱ्या दिवशी ताकदीने कामावर परतता येईल, असे कंपनीचे मत आहे. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करीत ही माहिती दिली आहे; जी आता चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा