Ticket Cancellation Charges: भारतीय रेल्वेने दररोज सुमारे ३ कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था मानली जाते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेत अनेक बदल झाले आहेत. रेल्वेच्या अनेक सेवा- सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. पण एवढे सगळे करुनही रेल्वेचे काही नियम गेल्या अनेक वर्षांपासून तसेच होते. ज्यात बदल करणे फार आवश्यक होते. यातील एक नियम म्हणजे तिकीट रद्द करण्याच्या शुल्काबाबतचा नियम. यातून रेल्वेने बऱ्यापैकी कमाई केली मात्र प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. पण भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याबाबतच्या निमयांमध्ये बदल केला आहे. हा बदल नेमका काय आहे समजून घेऊ…

आता वेटिंग आणि आरएसी (RAC) तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वे वेगळे शुल्क आकारणार नाही. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, जर एखाद्या प्रवाशाचे कोणतेही तिकीट वेटिंग किंवा आरएसीमध्ये असेल तर त्याच्याकडून सेवा शुल्क म्हणून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत.

real rickshaw puller had to pay fine after rickshaw puller put fake number on his rickshaw
खोट्या नंबर प्लेटमुळे खऱ्या रिक्षाचालकाला फटका, वाहतूक पोलिसांनी बनावट नंबर प्लेट असली वाहन घेतले ताब्यात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Movement to resume Kisan Special Train services
किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
st mahamandal upi ticket loksatta
ST Bus Tickets UPI : सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीचा यूपीआयचा तोडगा
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर

कोणत्या क्लाससाठी किती पैसे घेतले जाणार?

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता फक्त ६० रुपये कापले जातील. ज्यामध्ये स्लीपरसाठी १२० रुपये, थर्ड एसी तिकीट रद्द करण्यासाठी १८० रुपये, सेकंड एसी तिकीट रद्द करण्यासाठी २०० रुपये आणि फर्स्ट एसी तिकीट रद्द करण्यासाठी २४० रुपये कापले जातील.

यापूर्वी, रेल्वे सेवा शुल्क आणि वेटिंग आणि आरएसी तिकिटांवर किंवा इतर तिकीट रद्द करण्यावर सुविधा शुल्काच्या रूपात मोठी रक्कम वसूल केली जात होती. पण यामुळे प्रवाशांचे नुकसान होत होते. मात्र आता रेल्वेकडून शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट रद्द करताना तुमच्याकडून नियमांच्या बाहेर जाऊन कोणतेही अतिरिक्त पैसे मागितले जाणार नाहीत.

निर्णय का घेतला गेला?

झारखंडमधील गिरिडीह येथील सुनील कुमार खंडेलवाल, जे सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते आहेत, यांनी आरटीआय दाखल करून तिकीट रद्द करण्याच्या शुल्काबाबत तक्रार केली होती. यात त्यांनी रेल्वे केवळ तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून कोट्यवधी रुपये कमवत असून त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे अशी तक्रार केली होती. १९० रुपये किमतीचे तिकीट बुक केले जे वेटिंग लिस्टमध्ये होते परंतु ते रद्द केल्यानंतर केवळ ९५ रुपये परतावा म्हणून परत देण्यात आले, अशाप्रकारे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून भारतीय रेल्वे मोठी रक्कम जमा करत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. पण रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Story img Loader