उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका माणसाने ज्याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी सात फेरे घेतले, आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली, आज त्याच पत्नीचा हात त्याने कायमचा दुसऱ्याच्या हाती दिला. होय, हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. वास्तविक, येथे एका पतीने पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. यावेळी पती स्वतःही उपस्थित होता. त्याचवेळी ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.यावेळी पती स्वतःही उपस्थित होता. त्याचवेळी ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. लोक ही बॉलिवूड फिल्म हम दिल दे चुके सनमची कथा सांगत आहेत. मात्र, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या चित्रपटात नंदिनी (ऐश्वर्या राय) समीर (सलमान खान) सोबत लग्न न करता वनराज (अजय देवगण) कडे परतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोघांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, मात्र पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत होती. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण आशा ज्योती केंद्र आणि पोलिसांपर्यंत पोहोचले. जिथे पतीने कोणत्याही वादाविना पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास संमती दिली.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…”)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रकरण कानपूरच्या बरा-८ चे आहे. येथील रहिवासी असलेल्या पंकज शर्मा यांचा विवाह २ मे २०२१ रोजी भाऊती प्रतापपूर येथील रहिवासी कोमलसोबत झाला होता. लग्नानंतर कोमल सासरच्या घरी शांतपणे राहायची. संधी मिळताच ती अनेकदा तरुणाशी बोलायची. पंकज यांनी विरोध केला. त्याचवेळी, कोमलने त्याला सख्तीने विचारले असता, त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले.

( हे ही वाचा: जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क )

धुमधडाक्यात झालं होतं लग्न

कोमलने पती पंकजला सांगितले की, ती नववीत शिकत असताना सचेंडी येथील मुरलीपूर येथे राहणाऱ्या पिंटूसोबत तिचे प्रेमसंबंध होते. नातेवाइकांना माहिती मिळताच जबरदस्तीने लग्न लावून दिले होते. यानंतर हे प्रकरण आशा ज्योती केंद्रापर्यंत पोहोचले. तेथे केंद्रातील लोकांनी कोमलचा पती, तिचा प्रियकर आणि दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले.