ज्ञानोबा-माऊली-तुकाराम हा जयघोष करत आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने खडतर दिवेघाटाचा टप्पा पार केला. त्यानंतर रात्री ८ वाजता, सोपानकाकांच्या नगरीत अर्थात सासवडमध्ये माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. पहाटे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. अत्यंत उत्साहात, सकाळी ६ वाजता माऊलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. पुणे ते सासवड हा ३० किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी पालखीसह असलेले वारकरी वेगात चालत होते.आज एकादशी असल्याने वारकऱ्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले. पुणे ते दिवेघाटापर्यंत पालखी सोहळ्यात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तरूणांची संख्या लक्षणीय होती. माऊलींची पालखीने दुपारी ३.३० वाजता खडतर मानला जाणारा दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.
॥ वैष्णवां संगती सुख वाटे जीवा
आणिक मी देवा काही नेणी ॥
गाये नाचे उडे आपुलिया छंदे
मनाच्या आनंदे आवडीने ॥
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा