लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपारा येथील अनधिकृत इमारतींवरील कारवाई शुक्रवारी संपली. जानेवारी महिन्यापासून पालिकेने २२ दिवस कारवाई करून सर्व ४१ इमारती जमीनदोस्त केल्या.

नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील कचरा भूमी आणि सांडपाण्याच्या आरक्षित जागांवर ४१ अधिकृत इमारती बांधण्यात आल्या होत्या. या ४१ इमारती पाडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये ७ दिवस कारवाई करून ७ धोकादायक इमारतींवर पाडण्यात आल्या. मध्यंतरी रहिवाशी उच्च न्यायालयात गेल्याने कारवाई थांबली होती.

दुसऱ्या टप्प्यात २३ जानेवारी पासून कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मनाई आदेश लागू करण्यात आला. पोलिसांनी तब्ब्ल ५०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. सलग २२ दिवस कारवाई सुरू करण्यात आली. लोकांची समजूत काढण्यात आली. शुक्रवारी १४ फेब्रुावरी रोजी संध्याकाळी कारवाई संपली, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त दिपक सावंत यांनी दिली. या इमारतीमंध्ये २ हजारांहून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.

Story img Loader