सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

वसई- वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातून दररोज ६ जण बेपत्ता होत आहेत. २०२३ मधील आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे. मागील वर्षातील ११ महिन्यात २ हजार ४२ जणं बेपत्ता झाले होते. यापैकी ५१४ जणांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलीस उदासिन असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे

Five to six women injured in stampede at labor box distribution event
भंडारा : कामगार पेटी वाटपदरम्यान चेंगराचेंगरी, सहा महिला गंभीर जखमी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad PAwar
“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
Vacancies Cut By 23,723 Positions For Railway RRB NTPC Recruitment 2024
रेल्वे भरतीमध्ये २३,७२३ जागा घटल्या; अवघ्या ११,५८८ पदांसाठी भरती, उमेदवारांनी निराशा केली व्यक्त
Prime Minister Narendra Modi in Pune, Traffic changes
पुणे : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
flood in nagpur on Ambazari lake due to vivekanand statue
नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित
Jewellery stolen Lalbagh procession,
मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला
gang abused family and vandalized vehicles with coyotes in Hadapsar
पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

वसई विरार आणि मीरा रोड, भाईंदर शहरातून विविध कारणांमुळे लोकं घर सोडून जात असतात. त्यांचे प्रमाण वाढत आहे. २०२३ या वर्षात ( ३० नोव्हेंबर पर्यंत) २ हजार ४२ जणं बेपत्ता झाले होते. त्यामध्ये १ हजार १६२ महिला आणि ८८० पुरूषांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ५२८ जण घरी परतले आहेत तर अद्यापही ५१४ जणांचा शोध लागलेला नाही. म्हणजेच दिवसाला सरासरी ६ जण बेपत्ता होत असतात. मात्र बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी पोलीस उदासिन असल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे.

आणखी वाचा-वसईतून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता; दोन सख्या बहिणींचा समावेश

१८ वर्षाखालील अल्पवयीन मुलं बेपत्ता असल्यास अपहऱणाचा गुन्हा दाखल होतो. मात्र प्रौढ व्यक्ती बेपत्ता असल्यानंतर २४ तासांनी तशी नोंद केली जाते. परंतु अनेक प्रकरणात अशा बेपत्ता व्यक्तींच्या तपासाबाबत पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. नायगाव मध्ये राहणार्‍या नयना महंत (२८) ही तरूणी ९ ऑगस्टपासून बेपत्ता होती. मात्र पोलिसांनी वेळीच तपास केला नसल्याचा आरोप आहे. नंतर नयनाचा मृतदेह गुजराथच्या वलसाड येथे आढळून आला. परंतु तेव्हा तो बेवारस असल्याने गुजराथ पोलिसांनी त्याची विल्हेवाट लावली. नायगाव पोलिसांनी वेळीच तपास केला असता तर किमान माझ्या बहिणीचा मृतदेह तरी आम्हाला अंत्यसंस्कारासाठी मिळाला असता असा आरोप मयत नयनाची बहिण जया महंतने केला आहे.

२०२२ मध्ये श्रद्धा वालकर बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी २२ सप्टेंबर २०२२ मध्ये माणिकपूर पोलीस ठाण्यात केली होती. परंतू नंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची नोंद करण्यात आली. वसई पोलिसांनी तर तक्रार सुध्दा न घेता परत पाठवून दिले होते. या प्रकरणी मयत श्रध्दा वालकरच्या वडिलांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार केली होती. गृहविभागाने देखील या प्रकरणी चौकशीचे निर्दश दिले आहेत.

आणखी वाचा-अखेर सहाय्यक आयुक्त सचिन बच्छावच्या चौकशीसाठी समिती स्थापन

अल्पवयीन मुले बेपत्ता असल्यास अपहरणाचा गुन्हा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुले-मुले बेपत्ता असल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. यातील बहुतांश मुले-मुली प्रेमसंबंधातून घर सोडून गेलेली असतात. २०२२ या वर्षात ५०० मुले- मुली बेपत्ता झाली होती. २०२७ मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तपास कसा कराया याबाबत ७२ कलमी नियमावली बनवली होती. त्यामुळे ८९ टक्के प्रकरणात मुला-मुलींचा वेळीच शोध लावता आला होता. परंतु या नियमावलीचे पालन होत असताना दिसत नाही.