मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना गोठ्यात बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

भाईंदर पश्चिम येथील केशवसूष्टीमध्ये मोठ्या संख्येने जनावरे पाळण्यात आली आहेत.यातील आठ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.यापूर्वी या गाईना प्रतिबंधात्मक लंपी लस  देण्यात आली असल्यामुळे आता आजाराचा प्रभाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. मात्र इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून या गाईना विलगीकरणात  ठेवण्यात आले आहे.

Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
Guillain Barre Syndrome cases in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती? वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?
Patients suffer due to lack of facilities at Shatabdi Hospital in Govandi Mumbai print news
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा उपोषणाचा इशारा

मीरा भाईंदर शहरात २९ तबेले आहेत.यात भटके व खासगी  असे मिळून दीड हजाराहून अधिक जनावरे आहेत.या सर्व जनावरांचे लसीकरण झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र शहरात लंपी आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून जनावरांना बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

“मीरा भाईंदर मधील गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेकडून इतर जानावरांचे सर्वेक्षण करून उपाययोजना आखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.”रवी पवार – उपायुक्त

Story img Loader