भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील सांडपाण्याबर प्रक्रिया करणारे मलनि:सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यासाठी या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी एकूण १९ मलनि:सारण केंद्र (एसटीपी) आहेत. हे केंद्र जवळपास पंधरा वर्षापूर्वी उभे करण्यात आले आहेत. मात्र शहरात भूमिगत गटार योजनेचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे हे केंद्र अपेक्षे प्रमाणे कार्यरत नाही.परिणामी अनेकवेळा दूषित पाणी प्रक्रियाविनाच खाडी पात्रात सोडण्यात येत आहे.त्यामुळे पाणी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आरोप पालिकेवर सातत्याने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मलनि:सारण केंद्राचे ‘लेखापरीक्षण ‘ करून घेण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे.यात समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करून हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचा दावा काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महाप्रीत संस्थेची मदत

मिरा भाईंदर मधील मलनि:सारण केंद्राचे लेखा परीक्षण करण्याची जबाबदारी पालिकेकडून शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेला सोपवण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त संजय काटकर यांनी २३ जानेवारी रोजी महाप्रीतचे संचालक विजय पाटील यांच्या सोबत प्रशासकीय संयुक्त बैठक घेतली. यात या संस्थेला मल नि: सारण केंद्राचे लेखापरीक्षण करणे,विजेची बचत करण्याच्या दुष्टीने उपाययोजना सुचवने तसेच प्रकल्प कायमस्वरूपी सुरु ठेवण्यासाठी ज्ञान भागीदार आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम सोपावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.