वसई: बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घोषणा केली. येत्या ४-५ दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेल्या आहे. या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तर्फे भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीत राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. परंतु हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष निवडणूक लढवणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून साशंकता व्यक्त व्यक्त करण्यात येत होती. दुसरीकडे पक्षाच्या ठिकठिकाणी प्रचारही सुरू होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे आमच्याकडे सात ते आठ इच्छुक उमेदवार असून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
announcement , MMC election, MMC ,
एमएमसीच्या निवडणुकीमध्ये सावळागोंधळ, निवडणूक जाहीर होऊन १४ दिवस उलटल्यानंतरही उमेदवार अर्जाविनाच
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
SEBI Chairperson Madhavi Puri Buch last month in office print eco news
‘सेबी’च्या नव्या अध्यक्षांचा अर्थमंत्रालयाकडून शोध सुरू; माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळाचा शेवटचा महिना

हेही वाचा… Maharashtra News Live : काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश, इतर बातम्या वाचा एका क्लिकवर…

विकास कामे हा आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये आम्ही हा मतदारसंघ जिंकला होता. त्यामुळे नैसर्गिकरित्या आमचा या मतदारसंघावर हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक पक्षांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, माझे सर्व पक्षांची चांगले संबंध आहेत, त्यांनी माझ्याकडे पाठिंबा मागण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच मला पाठिंबा द्यावा असाही टोला त्यांनी लगावला. मला चिन्ह कुठलेही मिळाले तरी या सोशल मीडियाच्या काळात घरोघरी चिन्ह पोहचवले जाईल असेही ते म्हणाले.

Story img Loader