वसई : ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता. मात्र आपण रागाच्या भरात तक्रार केली होती, आता वाद मिटल्याचे तिने सांगितल्याने पोलिसांनी प्रकरण निकाली काढल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रध्दा वालकर हत्या प्रकरणात बुधवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आफताब श्रध्दाला नेहमी मारहाण करत होता. २०२०मध्ये त्याने श्रध्दाला बेदम मारहाण केली होती. यावेळी तीन दिवस ती रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रध्दाने नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आफताब माझी हत्या करून माझ्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देणार असल्याचे तिने म्हटले होते. दीड वर्षांनी श्रध्दाची ही भीती खरी ठरली. मे २०२२ मध्ये आफताबने दिल्लीमध्ये तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून इतस्तत: फेकले. श्रध्दाने त्यावेळी तक्रार मागे घेतली नसती तर आज कदाचित तिचा जीव वाचला असता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा