वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटिकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम व रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी सकाळी महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. वसई फाटा ते चिंचोटीपर्यंत सुमारे एक हजार नागरिक या मानवी साखळीत सहभागी झाले होते.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाने काँक्रिटिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र करण्यात येत असलेले काँक्रिटिकरणाचे काम अतिशय निकृष्ट व नियोजन शून्य पद्धतीने केले जात असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात यासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Ganeshotsav 2024 consecutive holidays cause traffic jam on Pune Bangalore highway
गणेशोत्सव, सलग सुट्ट्यांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर कोंडी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
traffic jam, Mumbai Goa highway
विश्लेषण : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी का होते? आणखी दोन वर्षे विघ्न कायम?
Public Works Minister Ravindra Chavan confession that it will take two years for the Mumbai to Goa highway to be completed
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली
Mumbai-Kolkata national highway, Flyover,
भोंगळ कारभार! मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला…
case against contractor for mumbai goa highway poor quality work
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक
motorists on nashik mumbai highway to face difficulties till samrudhi highway work done says chhagan bhujbal
समृध्दीचे काम होईपर्यंत नाशिक-मुंबई महामार्गावर अडचणी – छगन भुजबळ यांचा दावा
Traffic movement after debris clear on vani ghat
वणी घाटातील दरड हटवून मार्ग मोकळा

हेही वाचा – उज्ज्वल निकम यांच्यावरील हरकतीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

सातत्याने तक्रारी करून व महामार्ग प्राधिकरण जागे होत नसल्याने वसईतील एन एच ४८ ॲक्शन काउन्सिल या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. वसई फाटा ते चिंचोटीपर्यंत हजारो नागरिक मानवी साखळी करून हातात महामार्ग प्राधिकरणाचा निषेध व मागण्या फलक घेऊन उभे होते. महामार्गावरील काम पहाता त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिक यासह वसई विरारच्या औद्योगिक क्षेत्रालाही बसत आहे. याशिवाय अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

हेही वाचा – ‘महायुती’चे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर वर्चस्व असेल – मंत्री मुरलीधर मोहोळ

महामार्ग प्राधिकरणाने वसई विरार कार्यक्षेत्रात जे काँक्रिटिकरणाचे काम केले आहे ते खूप निकृष्ट दर्जाचे आहे. जर असे काम असेल तर रस्ते टिकणार तरी कसे असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्डे व काँक्रिटिकरणाचे काम प्राधिकरणाने योग्यरित्या करावे अशी आमची मागणी असल्याचे एन एच ४८ ॲक्शन काउन्सिल या सामाजिक संस्थेचे जेम्स कन्नमपुरा यांनी सांगितले.