वसई: वसई पूर्वेच्या सायवन चाळीस पाडा येथे तानसा नदीची पातळी वाढल्याने शेतीकामासाठी गेलेले १६ नागरिक अडकून पडले होते. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. एनडीआरएफ च्या पथकाने अडकून पडलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. वसई पूर्वेच्या भागातून तानसा नदी गेली आहे. या नदीला लागूनच अनेक गाव पाडे आहेत.

हेही वाचा : शहरबात : महावितरणचा ढिसाळ कारभार सुधारणार कधी ?

nagpur youth saved lives of 150 people by talking to american soldiers and presenting truth
नागपूरकर युवकामुळे वाचले १५० जणांचे प्राण, अमेरिकेतून सुटका झालेल्या तरुणाने सांगितला थरार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bmc stops immersion of pops ganesh idols due to court order
विसर्जनाविनाच गणेशमूर्ती मंडपात माघारी; न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखले
Shiv Pratishthan worker accident at Ambenali Ghat while going to Durg campaign
सांगली: दुर्ग मोहिमेला जाताना आंबेनळी घाटात अपघात, जिल्ह्यातील शिवप्रतिष्ठानचे १५ कार्यकर्ते जखमी
Amrit Gatha of Chartered Officer Abhijit Raut
नांदेडमध्ये अडीच वर्षे राहिले; अन् बंगल्याचे नाव बदलून गेले!
Rwanda backed rebels enter in Congo city
आफ्रिकेत पुन्हा संहाराची चाहूल
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त

सध्या पावसाळा सुरू असल्याचे पूर्वेच्या भागात शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. रविवारी सायवन चाळीस पाडा येथील १६ शेतकरी नागरिक तानसा नदी ओलांडून शेती कामासाठी गेले होते. शेतामध्ये काम करत असताना सकाळी ११च्या सुमरास तानसा धरणातून पाणी आल्याने पाण्याची पातळी अचानकपणे वाढली. त्यामुळे १६ जण शेतात अडकून पडले होते. या घटनेची माहिती महसूल विभागाला स्थानिकांनी दिली. महसूल विभागाने तातडीने एनडीआरएफचे पथक व अग्निशमन दल यांना पाचारण करण्यात आले होते. बोटींच्या साहाय्याने अडकून पडलेल्या १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. यात ८ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.

Story img Loader