वसई: वसई विरारच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे, काँक्रिटीकरणाच्या कामातील नियोजन शून्य कारभार याबाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी खानिवडे टोलनाका बंद पाडला. वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर विरारजवळ खानिवडे टोलनाका आहे.  मुंबई अहमदाबाद महामार्गावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र नियोजन शून्य कारभार दिसून येत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. अशी परिस्थिती असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा : भाईंदर: लग्न मोडल्याने तरुणीची आत्महत्या, ९ व्या मजल्यावरून उडी मारली

Uday Samant expressed said work of Mumbai Goa National Highway will be completed by next December
मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
mcoca action, Praveen Madikhambe, Loni Kalbhor,
लोणी काळभोरमधील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदारांवर मोक्का कारवाई, पेट्रोल-डिझेल चोरीतून कोट्यवधींची संपत्ती
Vasai, Pedestrian bridge work, National Highway,
वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
Delhi-Mumbai Expressway Road caved
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरामुळे खचला, अजब दावा करणाऱ्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी
Mumbai-Bengaluru journey now faster 14-lane highway to be made
मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग
ignorance to the repairing of the old Versova bridge
जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

परंतु दुसरीकडे सरार्स पणे टोलवसुली सुरू आहे. या रस्त्यावर समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याच उपाय योजना केल्या जात नसल्याने महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता सुमारास खानिवडे टोल नाका बंद पाडला होता. मागील तीन तीन तासांपासून खानिवडे टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले असल्याचा आरोप समीर वर्तक यांनी केला आहे त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही वर्तक यांनी सांगितले आहे.