वसई: एसटी महामंडळाच्या चालत्या एसटीचे चाक निखळल्याची घटना वसईत घडली आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघोली येथे ही घटना घडली. चालक व प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. विरारच्या अर्नाळा आगारातून एमएच १४ बीटी २७१८ या क्रमांकाची  एसटी येथे प्रवाशांना घेऊन निघाली होती.

हेही वाचा : ‘त्या’ चावी विक्रेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलिसांनी सूडबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप

Bhandup, security guard, Security Guard Brutally Beaten to Death, murder, gym trainer, entry dispute, Dream Society, Mumbai, arrest, police
इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Extortion from businessmen, retired officers, Food and Drug Administration
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
School Education Department instructs schools to implement safety measures for female students Akola
शासनाचे ‘वराती मागून घोडे’, अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांना ‘या’ सूचना
Laborer murdered, Solapur, Laborer,
सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून
Solapur, tobacco, attacks, anger,
सोलापूर : तंबाखू न दिल्याच्या रागातून जीवघेणा हल्ल्याच्या घटना
doctors, medicine, Controversy,
डॉक्टरांनी औषधे विकल्यास आता थेट कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेमुळे नव्या वादाला तोंड

निर्मळ वाघोली जवळील परिसरातून प्रवास सुरु असतानाच अचानकपणे पुढील बाजूचे चाक निखळल्याची घटना घडली. बस एका बाजूने झुकत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी चालकाला बस थांबविण्यास सांगितल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या एसटी मध्ये २० ते २२ प्रवास करीत होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एसटीची योग्य ती दुरुस्ती केली जात नसल्याने अशा घटना घडतात. अशा घटना घडू नये यासाठी बसेसची तपासणी करूनच सेवेसाठी मार्गावर पाठवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.