मयुर ठाकूर

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल १४६  बालके ही कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यात दोन बालक तीव्र कुपोषित असून १४४  बालके मध्यम कुपोषित आहेत. हे कुपोषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेशी समन्वय साधून विविध उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेने सांगितले,

Polling stations in schools faced objections in Hingana assembly constituency Nagpur district
भाजप आमदाराच्या शाळेत मतदान केंद्र, राष्ट्रवादीचा आक्षेप…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Kandal forest area
ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील अतिसंवेदनशील कांदळवन क्षेत्रांवर ६६९ सीसीटीव्हींची नजर
plot of 20 hectares in Tathwad was acquired for the headquarters of Pimpri-Chinchwad Police Commissionerate
पिंपरी : पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय ‘येथे’ होणार; बुधवारी मागणी आणि गुरुवारी ताथवडेतील २० हेक्टरचा मिळाला भुखंड
Proposal of underground parking under Patwardhan Udyan in Bandra cancelled
वांद्रे येथील पटवर्धन उद्यानाखालील भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव रद्द
Contract workers will be excluded from municipal hospital labor recruitment mumbai print news
महानगरपालिका रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवर टांगती तलवार; कामगार भरतीमधून कंत्राटी कामगारांना वगळणार
Aerial inspection of Salher fort in Baglan taluka by UNESCO team nashik news
युनेस्को पथकाकडून ‘साल्हेर’ची हवाई पाहणी
Adani group entered education sector in Chandrapur following cement company
सिमेंट उद्योग पाठोपाठ अदाणी समूहाला शाळा, शिक्षण विभागाचा निर्णय

मीरा- भाईंदरमध्ये शहरी व ग्रामीण अशा एकूण ८३ अंगणवाडय़ा आहेत, तर महापालिकेच्या बालवाडय़ांची संख्या २६ आहे. या अंगण व बालवाडय़ांमध्ये जवळजवळ १० हजारांहून अधिक मुले आहेत. एप्रिल २०१९ पासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण अंगणवाडयमंतर्फे केले जाते.यात ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी करून कुपोषणाची वर्गवारी केली जाते. यात मध्यम कुपोषित, मॅम आणि तीव्र कुपोषित अशी वर्गवारी केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका क्षेत्रात दोन बालके तीव्र कुपोषित असून १४४ बालके मध्यम कुपोषित आहेत. त्यांची दैनदिन तपासणी आणि उपचार सुरू असल्याची माहिती शिक्षण अधिकारी कविता बोरकर यांनी दिली आहे.   जिल्हा परिषदेशी समन्वय साधून लवकरच कुपोषणाला आळा घातला जाईल, असा विश्वास पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केला आहे.  २०१६ रोजी तत्कालीन महापौर गीता जैन व आयुक्त अनंत गीते यांच्या पुढाकाऱ्याने   बाल संगोपन केंद्र सुरु केले होते   ते सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी केली आहे.