भाईंदर :- मीरा रोड येथे प्रस्तावित सर्वधर्मीय दफनभूमीला विरोध होऊ लागल्याने अखेर पालिकेने हा निर्णय रद्द केला आहे. या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. मिरा रोड येथील सर्व क्रमांक २४७ येथे १५ कोटी रुपये खर्चून सर्वधर्मीय दफनभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र दफनभूमीची घोषणा झाल्यानंतर या भूखंडाजवळील आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.यात स्थानिक पातळीवर राजकीय पुढऱ्यांचा हस्तक्षेप  वाढल्याने वातावरण पेटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भाईंदर मधील महावीर भवन रद्द करण्याचा निर्णय

सतत नागरिकांकडून विरोध प्रदर्शन केला जात होता. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही जाहीर करण्यात केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघात विरोधात वातावरण तयार  होत असल्याचे  लक्षात येता यावर नमती भूमिका घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. सोमवारी दफनभूमीशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यालयात भेट दिली होती. याप्रसंगी सरनाईकांसह महापालिका आयुक्त संजय काटकर देखील उपस्थित होते. नागरिकांचा विरोध असल्यास असे कोणतेही काम आपण करणार नसल्याचे सांगत सरनाईकांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती काटकरांकडे केली. यावर नागरिकांच्या भावना लक्षात घेता दफनभूमीचा निर्णय रद्द करत असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे तसेच या जागेवर उद्यान उभारणार असल्याची ‘घोषणा आयुक्त काटकर यांनी यावेळी केली.

हेही वाचा >>> भाईंदर मधील महावीर भवन रद्द करण्याचा निर्णय

सतत नागरिकांकडून विरोध प्रदर्शन केला जात होता. येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही जाहीर करण्यात केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मतदारसंघात विरोधात वातावरण तयार  होत असल्याचे  लक्षात येता यावर नमती भूमिका घेण्याचा निर्णय आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. सोमवारी दफनभूमीशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यालयात भेट दिली होती. याप्रसंगी सरनाईकांसह महापालिका आयुक्त संजय काटकर देखील उपस्थित होते. नागरिकांचा विरोध असल्यास असे कोणतेही काम आपण करणार नसल्याचे सांगत सरनाईकांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती काटकरांकडे केली. यावर नागरिकांच्या भावना लक्षात घेता दफनभूमीचा निर्णय रद्द करत असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचे तसेच या जागेवर उद्यान उभारणार असल्याची ‘घोषणा आयुक्त काटकर यांनी यावेळी केली.