भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिका शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पुरुष सुरक्षा रक्षकांना एका निश्चित अंतरापर्यंतच वावर सुनिश्चित करण्यात आला आहे.याशिवाय शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नियंत्रण कक्षाशी जोडून त्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैगिक अत्याचारकानंतर शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाने देखील खबरदारीच्या दुष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा >>> वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

Cyber ​​theft robbed an IT expert in Vasai worth Rs 1.5 crore by digital arrest
सायबर भामट्यांनी केले ‘डिजिटल अरेस्ट’, वसईतील आयटी तज्ञाला दीड कोटींचा गंडा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
jaydeep apate arrested from kalyan
Jaydeep Apate Arrest : मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतलं ताब्यात
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

यात शहरातील पालिकेच्या ३६ शाळांमध्ये आवश्यक सुरक्षा रक्षक मागणी बाबतचा आढावा शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांकडून घेतला आहे.यात मुलींच्या शाळेत केवळ महिला सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले आहेत. तर मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेत मुख्याध्यापकांच्या मागणीनुसारच पुरुष सुरक्षा रक्षक तैनात केले जात आहेत.मात्र या सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांपासून एक सुरक्षित अंतर  ठेवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वर्गात,शौचालय परिसरात आणि इमारतीच्या गच्ची भागात या सुरक्षा रक्षकांना जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.तर शाळेवर आणि सुरक्षा रक्षकांवर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जाणार असल्याची माहिती उपायुक्त संजय दोंदे यांनी दिली आहे आहे.

हेही वाचा >>> वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक

सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षाला जोडणार

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एकूण ३६ शाळेत प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे उभारले आहेत.आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना भाईंदर पश्चिम येथील उड्डाणपूलाखालील नियंत्रण कक्षाला जोडण्याचे आदेश आयुक्त संजय काटकर यांनी दिली आहे.यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडून देखील शाळांवर नजर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने या नियंत्रण कक्षाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.