वसई- पोलीस भरती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेले ९४५ पोलीस कर्मचारी मिरा भाईदर आणि वसई विरारमधील विविध पोलीस ठाण्यात रुजू झाले आहे. यामुळे अपुर्‍या पोलीस बळाची अडचण दूर झाली आहे. सर्वाधिक पोलीस हे पेल्हार आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात मिळाले आहेत. तर मुख्यालयात २०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.

मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या भेडसावत होती. त्यासाठी मागील वर्षी ९९६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे पोलीस विविध पोलीस ठाणी, मुख्यालय, वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण ९४५ पोलीस कर्मचारी विविध पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले असून त्यात ३०३ महिला पोलीस कर्मचारी आहेत.

Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Notices issued to 400 employees for absenteeism on Republic Day Legislative Secretariat takes action Mumbai new
प्रजासत्ताकदिनी गैरहजर ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस, विधिमंडळ सचिवालयाची कारवाई
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
anti extortion squad by mira bhayandar police commissionerate
व्यावसायिकाना धमकवण्याचे प्रकार वाढले; खंडणी विरोधी पथकाची स्थापन
MHADA Mumbai Board plans to start redevelopment of police service residences Mumbai news
पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांसाठी ४७५० घरे; म्हाडाच्या सेवानिवासस्थानांचा लवकरच विकास
Retired police officer has unaccounted assets case of disproportionate assets registered
सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता, अपसंपदेचा गुन्हा दाखल; यवतमाळ जिल्ह्यात बजावली सेवा
Ratnagiri Mirkarwada Port
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी मत्स्य विभागाने पोलीस बंदोबस्तात चालविला हातोडा

हेही वाचा – मिरा भाईंदर महापालिकेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवर बंदी जाहीर

परिमंडळ १ मध्ये काशिमिरा (३१), मीरा रोड (२५), प्रस्तावित काशिगाव (३९), भाईंदर (३७), उत्तन(२८), नवघर (३०) आणि नया नगर मध्ये (४७) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परिंडळ २ आणि ३ मध्ये वसई (३०), माणिकपूर (१७), नायगाव (३४), तुळींज (३४), वालीव (३६), आचोळे (३३), पेल्हार (५५) विरार (३८) मांडवी (२०) नालासोपारा (५१) आणि मांडवी (३२) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुन्हे शाखेत २५, वाहतूक विभागात ५०, मोटर वाहन विभागात २५ पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २१८ पोलीस हे मुख्यालयातील विविध विभागात काम पाहणार आहेत.

हेही वाचा – चिंचोटी कामण-भिवंडी रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे दोन तास रास्ता रोको 

या नव्या पोलिसांच्या नियुक्त्यांमुळे पोलिसांचे बळ वाढणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या पालिका निवडणुका हाताळणे पोलिसांना सोपे जाणार आहे.

Story img Loader