वसई : मिरा रोड च्या नया नगर येथील धार्मिक मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने गुरुवार २५ जानेवारी रोजी पुकारलेला मीरा रोड, भाईंदर बंद मागे घेतला आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर बंदची घोषणा केली होती.

शहरातील तणाव निवळत असून मराठा आरक्षणाचा मोर्च्यासाठी मिरा भाईंदरमधून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मुंबईत दिला जाणार आहे, त्यामुळे पोलिसांनी बंद मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चर्चा करून कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बंद मागे घेत असल्याची बुधवारी प्रताप सराईनक यांनी जाहीर केले. मात्र कुणी डिवचण्याच्या प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

Pune, young man murder Dhayari, Dhayari,
पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
pune koyta attack
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू
roof of building collapsed at Grant Road possibly trapping some people under debris
ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
Raid in Hookah Parlor Kondhwa,
कोंढव्यात मॅश हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा
death of youth, procession, Vadgaon Sheri, Pune,
पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना
man dies due to electric shock during paigambar Jayanti procession
पुणे : पैगंबर जयंती मिरवणुकीत वीज वाहिनीच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू

हेही वाचा >>>नालासोपार्‍यात भर रस्त्यात तरूणीवर चाकू हल्ला; प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाचे कृत्य

शांती संदेश आणि  शाती तिरंगा यात्रेचे आयोजन

नया नगर मध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. कॉंग्रेस नेते मु्ज्जफर हुसेन हे घरोघरी भेटी देऊन शांततेचे आवाहन करत आहेत. तर शुक्रवारी माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी ‘श्रीराम शांती तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा भाईंदर ते मिरा रोड शहरात फिरून नागरिकांना शांततेचे आवहन करणार आहे.  या यात्रेत विविध धर्माचे नागरिक सहभाग घेणार असून सर्वाना शांततेचा संदेश देणार आहेत.