वसई-विरार महापालिकेकडेच कोणत्याही उद्यानांची तपशील नाही

विरार :  वसई-विरार महानगरपालिका उद्यानांच्या बाबतीत अजूनही उदासीन आहे. विरार पूर्व येथे मागील चार वर्षांपासून वनस्पती उद्यान बनलेच नाही. पालिकेने केवळ या ठिकाणी उद्घाटन करून सोडले आहे. पण  हे उद्यान विकसित करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडला नाही. मागील चार वर्षांपासून हे उद्यान विकासाच्या प्रतीक्षेत आहे. वसई-विरार महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी उद्याने विकसित केली जाणार होती. त्यासाठी उद्यान आरक्षित जागा पालिकेने हस्तांतरित करून त्यावर विविध उद्याने उभारण्याचे सांगितले होते. त्यानुसार विरार पूर्व मनवेल पाडा विभागातील नानानानी पार्क परिसरात सन २०१७ मध्ये पालिकेकडून वनस्पती उद्यान बांधण्याचे ठरवले होते. यासाठी पालिकेने या उद्यानाचा शिलान्याससुध्दा केला होता. पण मागील चार वर्षांत केवळ या उद्यानाचे प्रवेशद्वारच आणि कुंपण पालिकेने बांधले आहे. पण मागील चार वर्षांत पालिकेने यावर कोणतेही काम केले नाही. यामुळे नागरिकांत मोठी नाराजी पसरत आहे. हे उद्यान कधी आणि केव्हा पूर्ण होईल असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.

Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
Increase in 11th seats in Eklavya residential schools nashik news
एकलव्य निवासी शाळांमध्ये अकरावीतील जागांमध्ये वाढ
jawans killed seven Naxalites during encounter in Chhattisgarhs Dantewada
गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
park created through afforestation in Marol will open for citizens soon
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना

वसई-विरार महानगरपालिकेकडे १४० उद्याने आहेत. सध्या या उद्यानाला कोणीही वाली नाही. पालिकेकडून या उद्यानाची कोणतीही देखभाल केली जात नाही. यामुळे ही उद्याने भकास होत चालली आहेत.  उद्यानात साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.  तण, आणि झाडे झुडपे वाढून जंगलाचे स्वरूप या उद्यानात तयार झाले आहे. यामुळे जनावरांची भीती वाढली आहे. अनेक रोपटी, फुलांची झाडे मारून पडली आहेत,  तर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. शोभेच्या झाडांची छाटणी आणि खतपाणी न मिळाल्याने अनेक ठिकाणी ही झाडे मेली आहेत. यामुळे उद्यानात कमालीची अस्वच्छता आहे. असे असतानाही पालिका मात्र कोणतेही लक्ष देत नाही. त्यातच नव्याने तयार होणाऱ्या कोणत्याही उद्यानांचे तपशील पालिकेकडे उपलब्ध नाही. एकीकडे पालिका हरित वसई आणि सुंदर वसईचे दाखले देत असताना पालिकेच्या अखत्यारीतील उद्याने अपूर्ण अवस्थेत असून ती भकास होत चालली आहेत.